महाराष्ट्र ताज्या बातम्या

जेथे तेथे ‘गंगोपाध्याय’ बसवून मोदी-शहांनी न्यायव्यवस्थेचा निकाल लावलाय ; ठाकरेंचा हल्लाबोल

X: @therajkaran

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे (Thackray) मुखपत्र असलेल्या सामना (Saamana) मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर न्यायव्यवस्थेवरून जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. या सरकारने देशातील न्यायालये राजकीय घोडेबाजारात उभे करून संवैधानिक घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तसेच काही दिवसापूर्वी कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay) यांनी राजीनामा दिला व थेट भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसवर टीका केली. न्यायाधीश पदावर असताना गंगोपाध्याय यांनी राजकीय पक्षात प्रवेश करणे हा कुठला न्याय असे म्हणत त्यांनी न्यायालयाच्या सर्वोच्च आसनावर बसून भाजपासाठी काम करणारे अभिजित गंगोपाध्याय हे एकमेव नाहीत, तर असे अनेक ‘गंगोपाध्याय’ मोदी-शहांनी जागोजाग बसवले असल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

न्यायालयाच्या आधारावर आपली भारतीय लोकशाही उभी आहे. न्यायालये ही लोकांसाठी असतात. लोकांना ती जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्या दुर्वर्तनाचा जाब विचारण्याचाही लोकांना अधिकार आहे. त्यामुळे गंगोपाध्यायांसारखे तिचे पोकळ खांब आता उखडूनच टाकले पाहिजेत. नाहीतर भाजपची एजंटगिरी करणारे न्यायासनावर बसून पदाचा गैरवापर करतील, अशी भीती अग्रलेखातून व्यक्त केली आहे.

हायकोर्टात व सर्वोच्च न्यायालयात असे किती गंगोपाध्याय भाजपने बसवले आहेत व ते न्यायासनावर बसून कोणता घोडेबाजार करीत आहेत, याचा शोध सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी घ्यायचा आहे. मोदी-शहांना हवे तेच निकाल देणारे न्यायाधीश त्यांना हवे आहेत व त्यासाठीच भाजपने जागोजाग ‘गंगोपाध्याय’ निर्माण केले आहेत, असा हल्लाबोल सामनातून चढवला आहे.

भाजपने सर्व घटनात्मक संस्थांवर आपले हुकमी एक्के नियुक्त करून व्यवस्थेची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयासारख्या घटनात्मक संस्थाही आता राजकीय घोडेबाजारात उभ्या करून भाजपने संवैधानिक घोटाळा केला आहे. न्यायव्यवस्थेतील लोकांनी किमान विधिनिषेध पाळावेत हे भानही त्यांना आता राहिले नाही, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाने मोदी सरकारवर चढवला आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात