ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

रत्नागिरीत ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शिवसेनेचा खंदा नेता भाजपमध्ये घेणार प्रवेश

रत्नागिरी

उद्धव ठाकरे यांना कोकण दौऱ्याआधीच मोठा धक्का बसला आहे. तब्बल २५ वर्षे आमदार असलेले सूर्यकांत दळवी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सूर्यकांत दळवी १९९० ते २०१४ पर्यंत सलग २५ वर्षे दापोली मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षातील लोकांनी गद्दारी करून पाडल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांनी केला होता. यानंतर २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना नेते रामदास कदम यांचे पूत्र योगेश कदम यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज झाले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून मोठी जबाबदारी मिळेल अशी अपेक्षा असताना दापोली विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी मंत्री अनंत गीते यांच्याकडे सोपवण्यात आली.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शिंदे गटातील रामदास कदम हे सूर्यकांत दळवी यांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जातात, त्यामुळे सूर्यकांत दळवी यांच्या भाजप प्रवेशानंतर रामदास कदम आणि योगेश कदम यांच्याशी कसं जुळवून घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सूर्यकांत दळवींचा राजकीय प्रवास

  • १९९० साली विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघातून विजय
  • पुढील सलग २५ वर्षे दापोली विधानसभेत आमदार म्हणून काम
  • पक्षाकडून मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती, मात्र ती सूर्यकांत दळवींनी नाकारली
  • २०१४ साली सहाव्यांदा जिंकण्याची संधी हुकली, निवडणुकीत अपयशी ठरले.
Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात