महाराष्ट्र ताज्या बातम्या

अबब ! ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

X: @therajkaran

नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या स्थूल पुरवणी मागण्या असल्या, तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा ४८ हजार ३८४.६६ कोटी इतका आहे.

यापैकी १९ हजार २४४.३४ कोटी रुपयांच्या च्या मागण्या अनिवार्य खर्च, ३२ हजार ७९२.८१ कोटींच्या विविध कार्यक्रमांतर्गत, तर ३ हजार ४८३.६२ कोटींच्या मागण्या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने आहेत. 

अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये सर्वाधिक तरतूद ही सार्वजनिक बांधकाम विभागासाठी, ५ हजार ४९२ कोटी रुपये इतकी आहे. त्या खालोखाल कृषी – ५ हजार ३५१ कोटी, तर नगरविकास विभागासाठी ५ हजार १५ कोटी इतकी तरतूद  आहे.

खातेनिहाय पुरवणी मागण्या अशा –

सार्वजनिक बांधकाम विभाग – ५,४९२ कोटी रुपये 
कृषी व पदुम विभाग – ५,३५१ कोटी  रुपये
नगर विकास विभाग – ५,०१५ कोटी  रुपये
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग – ४,८७८ कोटी  रुपये
ग्रामविकास विभाग – ४,०१९ कोटी  रुपये
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग – ३,५५५ कोटी  रुपये
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – ३,४९५ कोटी  रुपये
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग – ३,४७६ कोटी  रुपये
इतर मागास बहुजन कल्याण विभाग – ३,३७७ कोटी  रुपये
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग – ३,०८१ कोटी  रुपये
गृह विभाग – २,९५२ कोटी  रुपये
आदिवासी विकास विभाग – २,०५८ कोटी  रुपये
सार्वजनिक आरोग्य विभाग – १,३६६ कोटी  रुपये
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग – १,१७६ कोटी  रुपये
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग – ९९९ कोटी रुपये
महसूल व वन विभाग  – ७८७ कोटी रुपये
जलसंपदा विभाग – ७५१ कोटी  रुपये
उच्च व तंत्र शिक्षण विभाग – ७३६ कोटी  रुपये
अल्पसंख्याक विकास विभाग – ६२६ कोटी रुपये
नियोजन विभाग – ६०० कोटी रुपये
विधि व न्याय विभाग – ४०८ कोटी रुपये
महिला व बाल विकास विभाग – ३७५ कोटी रुपये
वित्त विभाग – ३१६ कोटी रुपये

Also Read: संसदीय वाटचालीत हिवाळी अधिवेशनाचे महत्वपूर्ण योगदान; नागपुरात चर्चासत्र

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात