महाराष्ट्र

मविआच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय २७ फेब्रुवारीला !

X : @NalavadeAnant मुंबई: लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रीतपणे सामोरे जाणार असून जागा वाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत (MVA) कोणतेही मतभेद नसून काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीतच जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, असे स्पष्टीकरण पक्षाचे राज्य प्रभारी रमेश […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मणिपूर हायकोर्टाने मैतेई समाजाच्या आरक्षणाचा परिच्छेद हटवला, जातीय हिंसाचाराचं ठरलं होतं कारण

X: @therajkaran नवी दिल्ली : मणिपूर उच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला आहे. मैतेई समुदायाचा समावेश अनुसूचित जमाती (ST) मध्ये करण्याचा आदेश रद्द करण्यात आला आहे. २७ मार्च २०२३ ची सूचना राज्यात जातीय हिंसाचाराच्या उद्रेकाचं कारण असल्याचे म्हटले जात होते. मणिपूरमध्ये गेल्या मे महिन्यात जातीय हिंसाचाराने उग्र स्वरूप धारण केले होते. या जातीय हिंसाचारात आतापर्यंत 200 […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआमधील जागा वाटप कधी? रमेश चेन्नीथलांनी सांगितली नेमकी तारीख!

मुंबई उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपा यांच्यात लोकसभा जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता इतर राज्यांमध्ये इंडिया आघाडीचा गुंता सुटणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज राज्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे सामोरे जाणार आहे. महाविकास आघाडीची सातत्याने चर्चा होत असून जागा […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

उत्तर प्रदेशात तिरंगी लढत, सपा-काँग्रेस युती बसपासाठी धोक्याची?

लखनऊ उत्तर प्रदेशात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये जागावाटपावर ठराव झाला आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा असून यातील ८० पैकी १७ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार असून ६३ जागांवर सपा आपले उमेदवार उभे करणार आहेत. उत्तर प्रदेश हे पहिलंच राज्य आहे, जिथं इंडिया आघाडीत जागावाटपावर एकमत होऊ शकले आहे. अद्याप पश्चिम बंगाल, बिहार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘धर्माची अफू व ड्रग्जचे विष देऊन तरुणांना उद्ध्वस्त करण्याचे महायुती सरकारचे पाप’ – नाना पटोले

मुंबई पुण्यात तीन दिवसात तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडणे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरातून हजारो टन ड्रग्जचा धंदा होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. मुंद्रा बंदराचा मालक व भाजपाचे ‘आका’ यांचे काय संबंध आहेत, हे जगजाहीर आहे. महायुती सरकार राज्यातील तरुणांना धर्माचा अफू व ड्रग्जचे विष देऊन बरबाद करण्याचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का? वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई ‘केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी पूर्वीच्या घोषणेप्रमाणे ३१ मार्चपर्यंत कायम ठेवली आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यात कोणताही बदल केंद्र सरकारने केला नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे’, अशी खरमरीत टीका […]

महाराष्ट्र

निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाची दिशाभूल :- ॲड. यशोमती ठाकूर

X : @NalavadeAnant मुंबई: राज्य सरकारने आज मोठा गाजावाजा करत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे. याबद्दल मराठा समाजाचे अभिनंदन. मात्र, हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहे का? याबाबतची स्पष्टता सरकारला करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम सरकारने केले आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेसच्या […]

महाराष्ट्र

घाईघाईत काढलेल्या अधिसूचनेचे नेमके काय झाले? : कॉँग्रेसचा सवाल 

X : @therajkaran मुंबई: मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे. परंतु हे आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे हे सर्वात महत्वाचे आहे. आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले, पण या विधेयकावर सरकारने चर्चाही केली नाही. केवळ एकपात्री प्रयोग सादर केला आणि मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आजचा […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मानहानी प्रकरणात राहुल गांधींना जामीन मंजूर, अमित शहांविरोधात केलं होतं वक्तव्य

सुल्तानपूर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात सुलतानपूरच्या न्यायालयातून जामीन मिळाला आहे. आज जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींनी २५ हजारांचे दोन जातमुचलक भरले. ५ वर्षांपूर्वी कर्नाटकात अमित शहा यांच्यावर केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. 2018 च्या कर्नाटक निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी म्हणाले होते की, प्रामाणिकपणाबद्दल […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपमध्ये जाण्याचा कमलनाथांचा प्लान रद्द, राहुल गांधींशी चर्चेनंतर निर्णय बदलला; सुपूत्र नकुलनाथांचं काय?

भोपाळ मध्य प्रदेशातून सध्या मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यांचा खासदार मुलगा नकुलनाथ आणि काही आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींशी चर्चा केल्यानंतर कमलनाथ यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी, माजी मंत्री सज्जर सिंह […]