महाराष्ट्र

निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाची दिशाभूल :- ॲड. यशोमती ठाकूर

X : @NalavadeAnant मुंबई: राज्य सरकारने आज मोठा गाजावाजा करत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे. याबद्दल मराठा समाजाचे अभिनंदन. मात्र, हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहे का? याबाबतची स्पष्टता सरकारला करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम सरकारने केले आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेसच्या […]

महाराष्ट्र

घाईघाईत काढलेल्या अधिसूचनेचे नेमके काय झाले? : कॉँग्रेसचा सवाल 

X : @therajkaran मुंबई: मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे. परंतु हे आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे हे सर्वात महत्वाचे आहे. आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले, पण या विधेयकावर सरकारने चर्चाही केली नाही. केवळ एकपात्री प्रयोग सादर केला आणि मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आजचा […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मानहानी प्रकरणात राहुल गांधींना जामीन मंजूर, अमित शहांविरोधात केलं होतं वक्तव्य

सुल्तानपूर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात सुलतानपूरच्या न्यायालयातून जामीन मिळाला आहे. आज जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींनी २५ हजारांचे दोन जातमुचलक भरले. ५ वर्षांपूर्वी कर्नाटकात अमित शहा यांच्यावर केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्य केल्या प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. 2018 च्या कर्नाटक निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी म्हणाले होते की, प्रामाणिकपणाबद्दल […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपमध्ये जाण्याचा कमलनाथांचा प्लान रद्द, राहुल गांधींशी चर्चेनंतर निर्णय बदलला; सुपूत्र नकुलनाथांचं काय?

भोपाळ मध्य प्रदेशातून सध्या मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यांचा खासदार मुलगा नकुलनाथ आणि काही आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींशी चर्चा केल्यानंतर कमलनाथ यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी, माजी मंत्री सज्जर सिंह […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काका-पुतण्याचं नातं कसं असायला हवं…; लातूरमध्ये कार्यक्रमादरम्यान रितेश देशमुख भावुक

लातूर लातूरच्या निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना संकुलात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिकृतीचे अनावरण आज करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी अभिनेता रितेश देशमुख भाषणादरम्यान वडिलांच्या आठवणीत भावुक झाला. समाज आणि कुटुंबात वेगवेगळ्या भूमिका बजावताना तुम्ही लोकांशी कसे वागता हेच खरं भांडवल आहे. माझे आजोबा आणि वडील विलासराव […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशात ऑपरेशन कमल? कमलनाथ-नकुलनाथ यांच्या जोडीसह ‘या’ आमदारांवर भाजपची नजर!

भोपाळ लोकसभा निवडणूक २०२४ च्या आधी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ आपला सुपूत्र नकुलनाथ यांच्यासह भाजपमध्ये सामील होण्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या कमलनाथ हे नकुलनाथ यांच्यासह दिल्लीला पोहोचले आहेत. यादरम्यान मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस सक्रिय असल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी अलर्ट झाले आहेत. काँग्रेसच्या आमदारांना रोखण्यासाठी पक्ष संघटनेकडून प्रयत्न […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यसभा निवडणूक बिनविरोध; अधिकृत घोषणा अर्ज माघारीनंतरच

X : @milindmane70 मुंबई राज्यसभा निवडणुकीसाठी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विश्वास जगताप यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानंतर मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. मात्र आज पडताळणीअंती त्यांचा अर्ज बाद ठरल्याने आता निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर पाठवायच्या सहा सदस्यांसाठीची निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. यामध्ये भाजपाचे तीन व मित्र पक्षांचे दोन याप्रमाणे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर प्रश्नचिन्ह, 6 दिवसात 26 लाख लोकांचा सर्वे कसा? नाना पटोलेंचा सवाल

लोणावळा आज मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षणाचा अहवाल (Backward Class Commission report) राज्य सरकारकडे सुपूर्द केला. यानंतर येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून देण्यात आलं आहे. दरम्यान या अहवालावर सवाल उपस्थित केला जात आहे. ‘मराठा आरक्षण प्रश्नी सरकार समाजाची व मनोज जरांगे पाटील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

काँग्रेसच्या बैठकीतून 7 आमदार गायब, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले…

मुंबई काँग्रेसकडून आज विधिमंडळात आमदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेसचे ३६ आमदार उपस्थित होते. बैठक संपली तरी ७ आमदार आलेच नाहीत, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कोणकोणते आमदार त्यांच्यासोबत जाणार याबाबत चर्चा सुरू असताना आता विधिमंडळाच्या बैठकीत ७ आमदारांच्या अनुपस्थितीमुळे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘भाजपाकडे नेतृत्वाचा अभाव, आयारामांना राज्यसभेची उमेदवारी; निष्ठावंत कार्यकर्ते मात्र वंचितच’, नाना पटोलेंची टीका

मुंबई महायुतीकडून राज्यसभेच्या उमेदवारांची नावं आज जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातून चौघांची नावं जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांची नावं जाहीर करण्यात आली. चार पैकी दोन नावं काँग्रेसमधून आताच भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची आहे. यावरुन काँग्रेसकडून महायुतीवर टीका करण्यात आली आहे. ‘राज्यसभेच्या […]