‘शासन आपल्या दारी’च्या नावाखाली महायुतीकडून जनतेला गाजर, विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध
मुंबई : राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळ परिसरात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. ‘शासन आपल्या दारी आले, मिळाले गाजर, ‘कांद्याचा करून वांदा, महायुतीने दिले गाजर’, ‘शेतकऱ्यांनी मागितली मदत, सरकारने दिले गाजर,’ ‘कापसाला पाहिजे होता हमीभाव, मिळाले गाजर, म्हणत सरकारच्या विरोधात विधिमंडळ परिसरात जोरदार निदर्शने केली. राज्यातील जनतेला विकासाचे दिवा स्वप्न […]









