ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का? वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई ‘केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी पूर्वीच्या घोषणेप्रमाणे ३१ मार्चपर्यंत कायम ठेवली आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यात कोणताही बदल केंद्र सरकारने केला नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे’, अशी खरमरीत टीका […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांचं ठरलं; सरकारला इशारा

जालना राज्य सरकारने काल विशेष अधिवेशन घेत मराठा आरक्षणाचं विधेयक विधिमंडळात मंजूर करून घेतलं. मात्र मनोज जरांगे पाटील सरकारच्या या निर्णयावर नाराज आहेत. आम्हाला स्वतंत्र आरक्षण नको, तर ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. आम्हाला सरकारचे आरक्षण मान्य नाही. आता आमच्यापुढे आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही, असा इशारा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सख्ख्या पुतण्याने सोडली अजित पवारांची साथ, युगेंद्र पवार शरद पवार गटात!

मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणावर दबदबा असलेल्या पवार घराण्यातील तिसरी पिढीही राजकारणात सक्रिय आहे. आता पवार घराण्याचा आणखी एक वारसदार राजकारणात येत आहे. मात्र त्याने सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या गटात जाण्याऐवजी शरद पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांचे बंधु श्रीनिवास पवार यांचा सुपूत्र युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या गटात जाण्यापेक्षा शरद पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

ते वृत्त चुकीचं, 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम!

मुंबई कांदा निर्यातबंदी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी उठवल्याचं सांगितलं जात होतं. यानंतर किरकोळ बाजारात कांद्याच्या भावात काही प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायलं मिळालं होतं. मात्र ते वृत्त चुकीचं असून ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम असल्याचं केंद्रातील एका उच्च अधिकाऱ्यांकडून सांगण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मराठा आरक्षण कोर्टात टिकेल यात शंका’, राज्य सरकारच्या विधेयकावर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई विधिमंडळात आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनात राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर केला. मात्र त्याचा पुढचा मार्ग सोपा नसल्याचं सांगितलं जात आहे. मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण कोर्टात टिकेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या विधेयकाच्या मंजुरीनंतर शरद पवारांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं. शरद पवार म्हणाले की, कायदेशीर सल्लागारांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, विशेष अधिवेशनाचा केवळ फार्स’; विरोधकांचं टीकास्त्र

मुंबई आज विशेष अधिवेशन बोलावून राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले असले तरी न्यायालयात हे आरक्षण टिकणार नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यापुर्वी दोन वेळा निवडणुकीच्या तोंडावर असाच प्रयत्न झाला होता. मराठा समाज मागास असण्याला आधार काय? मागास आयोगाने घाईघाईत केलेलं सर्व्हेक्षण, १० टक्के आरक्षणाच्या आकड्यावर प्रश्नचिन्ह, ५० टक्क्यांहून अधिकच आरक्षण कोर्टात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘सरकारने 10 टक्के आरक्षण दिलं म्हणजे नेमकं काय दिलं?’ राज ठाकरेंचा सवाल

मुंबई आज विधिमंडळात आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं. यावेळी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यात १० टक्के आरक्षणाची तरतूद केल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र ५० टक्क्यांच्या वर गेलेलं हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही, असा संशय अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर जरांगे पाटील ठाम, आंतरवालीत उद्या बोलावली बैठक

जालना विधिमंडळात राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केलं असलं तरीही मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं जावं, या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. यासंदर्भात उद्या आंतरवाली सराटी येथे बैठक घेण्यात येणार असून यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती आहे. मराठा समाजाला ओबीसीतून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षण 10 टक्के; विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

मुंबई विधिमंडळात आजच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही पाठिंबा दर्शविला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विधेयक सादर करताना मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण दिल्याचा विश्वास व्यक्त केला. आज विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक विधानपरिषदेत सादर केले जाईल. तेथेही एकमताने मंजूर केल्यानंतर राज्यपालांकडे पाठवण्यात येईल. राज्यपालांच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय’, विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई मराठा आरक्षणाच्या विशेष अधिवशेनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. हा मराठा समाजाचा, मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा चिकाटीने दिलेल्या लढयाचा विजय आहे. हे आरक्षण कोर्टातही टिकेल आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे