ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षण 10 टक्के; विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

मुंबई

विधिमंडळात आजच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही पाठिंबा दर्शविला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विधेयक सादर करताना मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण दिल्याचा विश्वास व्यक्त केला.

आज विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक विधानपरिषदेत सादर केले जाईल. तेथेही एकमताने मंजूर केल्यानंतर राज्यपालांकडे पाठवण्यात येईल. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल.

मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यात १० टक्के आरक्षण
आज विशेष अधिवेशनात सादर केलेल्या विधेयकानुसार मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यात १० टक्के आरक्षण देण्यात तरतूद करण्यात आली आहे. देशातील २२ राज्यांत ५० टक्क्यांहून जास्त आरक्षण आहे. कोर्टात या आरक्षणाच्या समर्थनार्थ युक्तिवाद करण्यासाठी सरकारने वकिलांची फौज उभी केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आरक्षण कोर्टात टिकणार का?
नव्या विधेयकानुसार मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांहून अधिक झाली असल्याने कोर्टात हे टिकणार नाही असा दावा केला जात आहे. आधी जाणून घेऊया सध्या महाराष्ट्रात कुणाला किती आरक्षण आहे.

एससी १३ टक्के
एसटी ७ टक्के
ओबीसी १९ टक्के
भटके-विमुक्त – ११ टक्के
एसबीसी – २ टक्के
एकूण ५२ टक्के
(ईडब्ल्यूएस – १० टक्के
मराठा आरक्षण – १० टक्के)

या व्यतिरिक्त केंद्राकडून आर्थिक मागास वर्गासाठी (EWS) १० टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. त्यात आता मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं तर मिळून महाराष्ट्रात ७२ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. आणि केंद्राच्या आरक्षणाव्यतिरिक्त महाराष्ट्रात ६२ टक्के आरक्षण देण्यात आलं आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात