ताज्या बातम्या महाराष्ट्र

“….. तर त्यांची उमेदवारी काढून घ्यावी ” ; अभिजीत गंगोपाध्यायांच्यावर काँग्रेसकडून टीकेची झोड

मुंबई : कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय (Abhijit Gangopadhyay)यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi)आणि नथुराम गोडसे (Nathuram Godse)यांच्यावरुन टीका टिप्पणी केली आहे . यावरूनच आता त्यांच्यावर काँग्रेसने(Congress) टीकेची झोड उठवली आहे .काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश( Jairam Ramesh)यांनी या संदर्भात X वर एक पोस्ट लिहीली आहे. “अभिजीत गंगोपाध्याय यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी कोलकात्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादाने त्यांनी हे पाऊल उचलल. गांधी आणि गोडसेमध्ये मी कोणी एकाची निवड करु शकत नाही, हे त्यांच म्हणण म्हणजे केविणावाणी म्हणण्यापेक्षा वाईट अवस्था झाली. त्यांचे हे वक्तव्य अजिबात मान्य नाही. महात्मा गांधींच्या वारशावर दावा सांगणाऱ्यांनी लगेच त्यांची उमेदवारी काढून घ्यावी” असं जयराम रमेश यांनी लिहील आहे.

लोकसभेची रणधुमाळी (Loksabha Election )सुरु असताना अभिजीत गंगोपाध्याय यांची उमेदवारी काढून घेतली तर भाजप(BJp) चांगल्याच अडचणीत येणार आहे . याआधी त्यांनी कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसात अभिजीत गंगोपाध्याय यांना भाजपाने आपल उमेदवार बनवलं. अलीकडेच एका बंगाली चॅनलशी बोलताना ते म्हणाले की, मी गांधी आणि गोडसे यांच्यात निवड करु शकत नाही. या टीव्ही कार्यक्रमात इंटरव्यू दरम्यान रॅपिड फायर राऊंडमध्ये त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. अभिजीत गंगोपाध्याय यांना गांधी आणि गोडसे दोघांपैकी एकाची निवड करण्यास सांगण्यात आलं. या प्रश्नावर त्यांनी दीर्घ श्वास घेतला व म्हणाले की, मी या प्रश्नाच आता उत्तर देऊ शकत नाही. मला यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. कायद्याच्या पेशाशी संबंधित असल्याने मला दुसरी बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे. मला नथूराम गोडसे याच लेखन वाचलं पाहिजे. त्याने महात्मा गांधींच्या हत्येच पाऊल का उचलल? हे समजून घेतलं पाहिजे.यावरून आता त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे .

दरम्यान अभिजीत गंगोपाध्याय भाजपामध्ये सहभागी झाल्यानंतर म्हणाले की, “आज मी एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकतोय. मी भाजपामध्ये सहभागी होऊन आनंदी आहे. राज्यातून भ्रष्ट टीएमसीला बाहेर करण आमचा उद्देश आहे , असे त्यांनी सांगितले .याआधी हायकोर्टात वकिली करताना अभिजीत गंगोपाध्याय 2 मे 2018 रोजी कोलकाता उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बनले. उच्च न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, 30 जुलै 2020 रोजी त्यांना पदोन्नती देऊन स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यावर्षी ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. त्याआधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला . आता त्यांची उमेदवारी काढून घेतली जाणार का याकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात