ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजितदादाचं दिल्लीत ऐकतंय कोण ? ; भारतरत्न देण्याच्या घोषणेवरून जयंत पाटलांचा टोला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ( Sharad Pawar Group)आज पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा (Election Manifesto) प्रकाशित करण्यात आला. त्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील( Jayant Patil )यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलेल्या आश्वासनावर निशाणा साधला आहे . त्यांनी महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan)यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्याची मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे असे सांगितलं होत . यावरून आता जोरदार टीका करत जयंत पाटील म्हणाले ,, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी होऊ शकते तो जाहीरनामाचा भाग होऊ शकत नाही. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्यावा ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. अजित पवार यांनी भारतरत्न बाबत मागणी केली असली तरी दिल्लीमध्ये त्यांचं फारसं कोणी ऐकत नसल्याचा टोला त्यांची अजितदादांना लगावला आहे .

याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे आणि त्यासाठी आम्ही पक्ष म्हणून काम करू अशी भूमिका घेण्यात आली आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाम पाठिंबा राहील याची आम्ही हमी देतो असे अजित पवार म्हणाले होते .यावरूनच आता दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांमध्ये वाद होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या या घोषणेवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खरमरीत टीका केली आहे

दरम्यान या जाहीरनाम्यावेळी पक्षप्रमुख शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे . ते म्हणाले , 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात भाजपचं सरकार आहे. या काळात त्यांनी शेतीसाठी काय केलं हे सर्वप्रथम लोकांच्या समोर मांडणं आवश्यक आहे. दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून शेती विषयक प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत. याबाबत सरकार काहीच बोलत नसल्याची टीका पवार यांनी केली आहे .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात