ताज्या बातम्या मुंबई

400 पारचा आकडा गाठण्यासाठी चंद्रावरुन खासदार आणणार का?, आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल

मुंबई- २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं उद्धव ठाकरे यांची फसवणूक केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. गोरोगावात आयोजित युवा स्वाभिमान मेळाव्यात ते बोलत होते. भाजपा ही भारतीय जनता पार्टी नसून भारतीय जुमला पार्टी असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केलीय.

चंद्रावरुन खासदार आणणार का- आदित्य

देशात ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचा संकल्प भाजपानं केलेला आहे. मात्र प्रत्यक्षात भाजपाचे इतके खासदार निवडून येणार नाहीत, असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय. ४०० पेक्षा कमी खासदार निवडून येतील, मग काय चंद्रावरुन खासदार आणणार का, असा सवालही त्यांनी केलाय.

दक्षिणेकडच्या राज्यांनी भाजपाला नाकारलेले आहे. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही भाजपाला किती जागा मिळतील याबाबत साशंकता असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत.

पीएम केअर फंडांवरही आक्षेप

खिचडी घोटाळा प्रकरणावरुन सध्या मुंबईत सुरु असलेल्या कारवाईवरुनही आदित्य ठाकरेंनी भाजपावर शरसंधान केलंय., पीएम केअर फंडाचा खर्चही जाहीर करा, अशी मागणीही त्यांनी केलीय.

हेही वाचाःमुख्यमंत्री शिंदे आज पुन्हा कोल्हापुरात ; संजय मंडलिक, धैर्यशील मानें आज अर्ज भरणार ; राजू शेट्टींचाही आजचा मुहूर्त

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज