महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

राज ठाकरे महायुतीसोबत गुढी उभारणार? राज ठाकरे किती वाजता भाषणाला उभे राहणार? शिवाजी पार्कच्या सभेकडे राज्याचं लक्ष

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अमित शाहा यांची काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेट घेतल्यानंतर, राज ठाकरे आज महायुतीसोबत जाणार का, याचा निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळं राज ठाकरे आज शिवाजी पार्कवर काय बोलणार याकडं सगळ्यांचं लक्ष असेल. शिवाजी पार्कच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आलीय.

70 हजार खुर्च्यांची व्यवस्था

या सभेला महाराष्ट्रभरातून मनसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्यासाठी 70 हजार खुर्च्यांची व्यवस्था शिवाजी पार्कात करण्यात आलेली आहे. मंचावर राज ठाकरे आणि इतर पदाधिकारी यांच्यासाठी 30 खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत. संध्याकाळी साडे सातच्या सुमारास राज ठाकरेंचं मुख्य भाषण होईल त्यापूर्वी मनसेच्या सहा ते सात नेत्यांची भाषणं होण्याची शक्यता आहे.

या सभेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. ३५ पोलीस अधिकारी सुरक्षेसाठी तैनात असतील. तसंच १०० मनसेचे सुरक्षा रक्षकही असणार आहेत.

राज ठाकरेंकडून शिवतीर्थावर येण्याचं आवाहन

राज ठाकरेंच्या सभेचे तीन ते चार टिझर आत्तापर्यंत समोर आलेले आहेत. यात शिवाजी पार्कवर आपली भूमिका मांडणार असल्याचं सांगत, शिवतीर्थावर येण्याचं आवाहन राज ठाकरे करताना दिसतायेत. आता राज ठाकरे काय भूमिका घेणार आणि त्याचे राजकारणात काय पडसाद उमटणार हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचाःनाशिकचा फटका साताऱ्याला, महायुतीत तीन जागांचा तिढा अद्यापही कायम, कधी सुटणार पेच?

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात