ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आरबीआयचा लाभांश देशात ‘फिर एक बार मोदी सरकार’ आणणार ?

मुंबई : लोकसभेच्या रणधुमाळीत (Lok Sabha Election)पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असताना आता सहाव्या टप्प्याचे मतदान सुरु झाले आहे. त्यानंतर सातव्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागेल असताना याबाबाबत राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता . आता भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) (Reserve Bank of India )घेतलेल्या निर्णयामुळे ‘फिर एक बार मोदी सरकार’ येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे . आरबीआयने सरकारला विक्रमी लाभांश (डिव्हीडेंड) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय निवडणुकासंदर्भात जोडलाजात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा सत्तेत येणार असल्याचे हे संकते मानले जात आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा संपल्यानंतर ४ जून रोजी देशाचे पंतप्रधान कोण होणार? याचा फैसला होणार आहे .दरम्यान आरबीआयने सरकारला दिलेला लाभांश पाहता या निवडणुकीत मोदींना यांचा फायदा होणार आहे . 2023-24 या आर्थिक वर्षात आरबीआय सरकारला 2.11 लाख कोटी रुपये देणार आहे. 2022-23 मध्ये 87,416 कोटी रुपयांचे डिव्हीडेंड आरबीआयने दिला होता. आरबीआयच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा मोदी सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे .आरबीआयने दिलेला हा लाभांश म्हणजे सरकारसाठी मोठा दिलासा आहे. यामुळे वित्तीय तूट कमी होण्यास मदत होईल. सरकार विविध सामाजिक आणि विकास कार्यक्रमांसाठी वापरण्यास सक्षम असेल. नवीन सरकार जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. या रकमेमुळे अनेक योजनांसाठी सरकारच्या हातात पैसा येणार आहे.

आरबीआयच्या निर्णयामुले भाजप सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत आहेत . याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. आरबीआयने सरकारला 2.11 लाख कोटी रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून निश्चित केलेल्या बजेटपेक्षा ही रक्कम दुप्पट आहे. सरकारने 1.02 लाख कोटी रक्कम निश्चित केली होती. या निर्णयानंतर गुरुवारी आणि शुक्रवारी शेअर बाजारात दमदार वाढ झाली.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात