ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘रिलायन्स ही गुजराती कंपनी…’, तर तुमचा सगळा बाडबिस्तरा गुंडाळा, गुजरातला जाऊन बसा; अंबानींच्या वक्तव्यावर मनसे आक्रमक

मुंबई

रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये केलेल्या वक्तव्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तिखट प्रतिक्रिया देत गुजराती कंपनी असेल तर तुमचा सगळा बाडबिस्तरा गुंडाळा, अँटिलिया पण गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा, महाराष्ट्रात काय करता? असा सवाल उपस्थित केला.

यावेळी पुढे ते म्हणाले, रिलायन्स ही भारतीय कंपनी आहे, असं आम्हाला वाटत होते. मात्र कालच्या समिटमध्ये अंबानींनी ही गुजराती कंपनी होती, आहे आणि पुढेही राहिल, असं स्पष्टच सांगितलं आहे. तुमची कंपनी गुजराती होती तर महाराष्ट्रात का आलात? मराठी माणसाने दिलेल्या जमिनीवर उद्योग करत आहात ना?

संदीप देशपांडेंनी यावेळी मराठी माणसाला आवाहन केलं आहे. यापुढे रिलायन्सची वस्तू खरेदी करताना ती भारतीय कंपनीची नाही तर गुजराती कंपनीची आहे हे लक्षात ठेवायला हवं. अंबानींचा उद्देश जर गुजरातचा विकास असेल तर महाराष्ट्रात त्यांचं काम काय?

पंतप्रधान देशाचे की गुजरातचे?
मुकेश अंबानींनी हे वक्तव्य केलं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे उपस्थित होते. मात्र त्यांनीही काही आक्षेप घेतला नाही, खरं पाहता पंतप्रधान भारताचे आहेत की गुजरातचे असा प्रश्न उपस्थित होतो.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे