ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा…..!

X : @NalavadeAnant

मुंबई : ‘राज्यात दिवसाढवळ्या दारोदारी गोळीबार होत असताना काय या राज्यात गुंडाराज आहे की शिवशाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनाला पडला आहे. सत्ताधारी आमदारच पोलीस ठाण्यात, गणेशोत्सव मिरवणुकीत गोळीबार करतात. मुख्यमंत्र्यांचे गुंडांसोबतचे फोटो समोर येतात.

या सर्व घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी सभागृहात २८९ अनव्ये मांडलेल्या प्रस्तावावर राज्यातील कायदा व सुव्यस्थेच्या गंभीर प्रश्नांबाबत गंभीर बनत चाललेल्या परिस्थितीवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर काही गुंड त्यांच्यासोबत फोटो काढतात.पुण्यातील गुंड शरद मोहोळ याच्या हत्येनंतर सत्ताधारी आमदार त्याला हिंदू डॉनची पदवी देतात. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला केला जातो. गोळीबार झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या शहरप्रमुखाचे स्वागत केले जाते.माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली जाते. या सर्व घटना पाहता राज्यात सामान्य माणूस सुरक्षित नसून गुंड सुरक्षित असल्याची भावना जनमानसात असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते दानवे यांनी यावेळी सभागृहाचे लक्ष वेधले.त्याचवेळी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणीही विरोधी पक्षनेते दानवे यांनी सभागृहात लावून धरली.

हे ही वाचा – जरांगेंचा बोलविता धनी कोण? बैठका कोणी घेतल्या? वॉररूम कुणी स्थापन केल्या? फडणवीस विधानसभेत बरसले!

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात