महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

भाजपचं बिहारच्या मागासलेपणासाठी पूर्ण जबाबदार ; राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा आरोप

मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission)देशातील लोकसभा निवडणुका सात टप्प्यात जाहीर केल्या होत्या. यापैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. अशातच आता प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तवला . त्यानंतर त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खटके उडत आहेत . किशोर यांनी बिहारच्या राजकारणावरुन भाजपावर टीका केली आहे. भाजपाने बिहारच भविष्य बदलण्यात इंटरेस्ट दाखवला नाही त्यांना बिहारच्या लोकांची अजिबात चिंता नाही त्यांच्या पूर्ण मागासलेपणासाठी फक्त भाजप जबाबदार आहे . असा आरोप त्यांनी केला आहे .

भाजपने 2020 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूपेक्षा जास्त जागा जिंकूनही बिहारच भवितव्य बदलण्याची जबाबदारी उचलली नाही. त्यांनी विचार न करता फक्त 42 आमदार असलेल्या नितीश कुमारांकडे राज्य सोपवलं अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली आहे . तसेच. “विविध पक्ष फोडून भाजपाने अन्य राज्यात सरकार बनवलं असेही ते म्हणाले आहेत . बिहारच्या लोकांसोबत काय होईल? याची भाजपाला अजिबात चिंता नाहीय’ असा आरोप त्यांनी केला आहे . यावरून आता बिहार भाजपाचे प्रवक्ते मनोज शर्मा यांनी प्रशांत किशोर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रशांत किशोर यांचे हे सर्व आरोप म्हणजे निव्वळ मूर्खपणा असल्याच त्यांनी म्हटलं आहे. ‘

राजकीय रणनीतीकारांच्या आरोपानंतर मनोज शर्मा म्हणाले , भाजपाने जी काही मदत केली आहे ती राज्य आणि पक्षाच हित डोळ्यासमोर ठेऊन पीकेला 2005 आधीची बिहारची स्थिती माहित नाही. जेडीयू आणि आम्ही दोघांनी मिळून बिहारची RJD च्या जंगलराजमधून सुटका केली.भाजपचे त्यांच्याविषयीचे धोरण चांगले आहे असे शर्मा म्हणाले .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात