X: @therajkaran
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर (Loksabha Election) भाजप (BJP) पक्षाकडून राज्यातील विद्यमान खासदारांचा पक्षाअंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्वेनंतर भाजपच्या विद्यमान खासदारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. गेल्या पाच वर्षात भाजपच्या खासदारांची कारकीर्द बघता काम ना करणाऱ्या खासदारांचा पत्ता कट करून भाजप नवी चेहऱ्यांना संधी देणार आहे. येत्या दोन दिवसांत भाजपची जी उमेदवारांची यादी येण्याची शक्यता आहे, त्यामध्ये नवीन नावं दिसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
विद्यमान खासदारांना निवडून दिलेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत सामाजिक समिकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारण, त्यांच्याबाबत असलेली नाराजी, निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता, 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेले आक्षेप, या कारणांमुळे भाजप विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, उमेदवारी देताना विद्यमान खासदारांची कामगिरी पाच वर्षात कशी राहिली हाच निकष भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून डोळ्यासमोर ठेवण्यात आलेला आहे. महायुतीमध्ये (Mahayuti) कुणाला किती जागा मिळणार याची चर्चा सुरू असताना, आता भाजपच्या विद्यमान खासदारांचे टेन्शन वाढणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपकडून धक्कातंत्र वापरले जाण्याची शक्यता आहे.