महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mumbai : खोदकाम केलेल्या १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण

मुंबई: रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या प्रकल्प अंतर्गत संपूर्ण मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण नियोजित कालावधीत पूर्ण होत आहे. पावसाळापूर्व नियोजनानुसार, खोदकाम केलेल्या एकूण १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. दिनांक २ जून २०२५ पर्यंत काँक्रिट क्यूरिंग पूर्ण होत असून दिनांक ५ जून २०२५ पर्यंत रस्त्यावरील सर्व रस्तारोधक (Barricades) हटविले जातील व रस्ते वाहतुकीस खुले होतील, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

धारावी पुनर्विकास : मुंबई महानगरातील सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर बनविणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई महानगरात येणाऱ्या काळात धारावी हे सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर म्हणून नावारूपाला येईल. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी ही ओळख पुसून टाकून सामाजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरणाचे धारावी प्रतिक ठरणार आहे. सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत असून जे अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बीडीडी चाळील रहिवाशांना येत्या श्रावणाच्या आत चाव्या : पालकमंत्री एँड आशिष शेलार

मुंबई : बीडीडी चाळीतील रहिवाशांना नव्या घराच्या चाव्या येत्या श्रावणाच्या आत दिल्या जातील असे म्हाडातर्फे आज जाहीर करण्यात आले. उपनगर पालकमंत्री एँड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रहिवाशांसमोर म्हाडाच्या मुंबई बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरिकर यांनी ही माहिती दिली. वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील रहिवाशांची नव्या घरांचा उंच टाँवर उभा राहिला असून रहिवाशांचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावाच – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी

मुंबई : पाकपुरस्कृत दहशतवादाचा पूर्णतः नायनाट करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला असून, त्याच दृष्टीने नुकत्याच पार पडलेल्या ‘सिन्दूर ऑपरेशन’ द्वारे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. या यशस्वी कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीर भारताने आपल्या ताब्यात घ्यावा, अशी ठाम भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही, चर्चाही नाही – सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती

मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, तो आमच्या विचाराधीनही नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करणे अथवा भूमिका घेणे अनाठायी ठरेल,” अशी स्पष्ट भूमिका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. ते म्हणाले, “आम्ही सध्या एनडीएचा घटक आहोत आणि यापुढेही एनडीएमध्येच राहणार आहोत. या भूमिकेशी एकरूप होणाऱ्यांचे पक्षात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन व पगारबंदी प्रक्रियेला शासनाची तूर्तास स्थगिती – शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

मुंबई: राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन आणि पगारबंदीच्या प्रक्रियेला शासनाने तूर्त स्थगिती दिली असून, त्यामुळे राज्यातील शेकडो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनास न्यायालयीन आदेश असूनही प्रक्रिया सुरू होती. तसेच समायोजनास नकार दिलेल्या शिक्षकांचे पगारही थांबवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संचमान्यता, समायोजन आणि पगारबंदी या तिन्ही […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कॉम्रेड लहानू कोम : ध्येयनिष्ठ आणि झुंझार आदिवासी नेतृत्व हरपले!

By: डॉ. अशोक ढवळे कॉम्रेड लहानू कोम यांच्या जाण्याने १९४५-४७ सालच्या ऐतिहासिक वारली आदिवासी उठावाचे नेतृत्व करणाऱ्या कॉम्रेड शामराव परुळेकर आणि कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्या तालमीत तयार झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या फळीतील एक ध्येयनिष्ठ आणि झुंझार आदिवासी नेतृत्व हरपले आहे. अत्यंत चाणाक्ष, अभ्यासू, लढाऊ व प्रतिभाशाली नेता आज आपल्याला सोडून गेला आहे. लहानू शिडवा कोम हे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

हमीभाव वाढीचे स्वागत, पण प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे — डॉ. अजित नवले

मुंबई: केंद्र सरकारने नुकतीच शेतीमालाच्या हमीभावामध्ये वाढ जाहीर केली आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने या वाढीचे स्वागत करण्यात येते. त्याचवेळी ही लाभ प्रत्येकी शेतकऱ्यांच्या पदरात पडावे अशी अपेक्षा किसान सभेने व्यक्त केली आहे. या संदर्भात अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ अजित नवले यांनी नमूद केले आहे की, या वाढीला खरा अर्थ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रज्ञाचक्षू शरयू सामंत यांची तीन दशकांहून अधिक काळ चाललेली आगळीवेगळी ईश्वर सेवा!

By योगेश वसंत त्रिवेदी मुंबई: सुमारे ७५ वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आरती भदाणे यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तेथेच पूर्ण केले. पुढे त्या मुंबईच्या बोरीवली (पश्चिम) परिसरात स्थायिक झाल्या. त्यांचा विवाह अशोक उर्फ विश्वनाथ सामंत यांच्याशी झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. परंतु नियतीचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“बाताश्री शेलार!” – बॅनरबाजीच्या माध्यमातून शिवसेनेचा आशिष शेलारांवर हल्लाबोल

मुंबई: मुंबईच्या बांद्रा परिसरात भाजप नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या विरोधात शिवसेनेकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. “बाताश्री शेलार” असा उल्लेख असलेले हे बॅनर सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहेत. शिवसेना नेते अखिल चित्रे यांच्या नेतृत्वाखाली लावण्यात आलेल्या या बॅनरांमध्ये शेलारांवर तिखट शब्दांत टीका करण्यात आली आहे. बॅनरवरील मजकूरात म्हटलं आहे – “अहो […]