महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यासाठी लवकरच ‘एकात्मिक पार्किंग धोरण’ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई : मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वाहनांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. यावर प्रभावी उपाय म्हणून राज्यासाठी ‘एकात्मिक पार्किंग धोरण’ लवकरच आणण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या धोरणाची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) अंतर्गत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – तातडीने मदतीची आवश्यकता : अखिल भारतीय किसान सभा

मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे, शेती पिकांचे आणि शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीप पूर्व मशागतीची कामे पूर्णपणे वाया गेली असून, फळबागा, भाजीपाला आणि अन्य उभ्या पिकांवर मोठा फटका बसला आहे. कमी वेळेत अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतजमिनी आणि बांधबंधिस्ती वाहून गेली आहेत. अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

२० मे नंतर कुठलेही काँक्रिटीकरण करु नका : उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : मुंबई उपनगरातील रस्त्यांची पाहणी मुंबई उपनगर पालकमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आजपासून तिसऱ्यांदा सुरू केली असून, या पश्चिम उपनगरातील पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणच्या अपूर्ण रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, २० मे नंतर कोणतेही नवीन सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करू नये, 31 मे पर्यंत रस्ते वाहतूक योग्य करा, असे स्पष्ट निर्देश […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मातंग समाजाला राजकीय सत्तेत वाटा मिळवून देणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

कोल्हापूर / मुंबई : मातंग समाजाला न्यायहक्क मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) सातत्याने प्रयत्नशील आहे. बौद्ध आणि मातंग समाज हे महाराष्ट्रात भाऊभाऊ म्हणून एकत्र आहेत. अनुसूचित जातींमध्ये महाराष्ट्रात प्रमुखतः बौद्ध व मातंग समाज असून, एकूण 59 अनुसूचित जातींना एकत्र करून ओबीसी, मराठा, मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाजांना निळ्या झेंड्याखाली एकत्र आणणे हे आमचे ध्येय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड-दापोली मार्गावर अवकाळी पावसामुळे दोन अपघात – रस्त्याच्या निकृष्ट कामावर सरपंचांचा सवाल

महाड : महाड-दापोली मार्गावर अवकाळी पावसामुळे २४ तासाच्या आत सलग दोन अपघात झाल्याने महामार्गावरील रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दोन्ही अपघातांमध्ये सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी आगामी पावसाळ्यात मोठ्या दुर्घटनांचा धोका निर्माण झाला आहे, असा इशारा शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी दिला आहे. शनिवारी दुपारी स्वारगेट एसटी डेपोची विन्हेरे-स्वारगेट […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईतील रस्त्यांच्या कामात केवळ २५ टक्केच प्रगती – पुन्हा एकदा खड्ड्यांचा पावसाळा मुंबईकरांच्या वाट्याला?

मुंबई: मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तब्बल २१२१ रस्त्यांपैकी केवळ ४७९ रस्त्यांचेच काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित १६०० हून अधिक रस्त्यांचे काम अद्याप अर्धवट अवस्थेतच आहे. संपूर्ण मुंबई शहर हे सध्या खोदकाम, धूळ आणि वाहतूक कोंडीत अडकलेले असताना, आता पावसाळ्याच्या उंबरठ्यावर चिखलात बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. महापालिका आयुक्तांनी फेब्रुवारीमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ३१ मे २०२५ पर्यंत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

एस. एम. देशमुख यांनी मांडलेले पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा करून सोडवणार – मंत्री नितेश राणे यांची ग्वाही

By राजन चव्हाण सिंधुदुर्ग : “पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी आज अभिवादन सभेत मांडलेले मुद्दे शासन दरबारी नक्कीच पाठपुरावा करून मार्गी लावले जातील,” अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. सिंधुदुर्गनगरी येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यव्यापी जमीन हक्क परिषदेतून १ जूनला संघर्षाची हाक

किसान सभेचे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन; जमीन हक्कासाठी जिल्हा-तालुका कार्यालयांवर मोर्चांचे आवाहन संभाजीनगर — अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र कौन्सिलतर्फे छत्रपती संभाजीनगर येथे भरविण्यात आलेल्या राज्यव्यापी जमीन हक्क परिषदेतून १ जून रोजी राज्यभर संघर्षाचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेण्यात आला. जंगल, देवस्थान, इनाम, गायरान आणि इतर जमिनी अनेक वर्षे कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे त्या तत्काळ करून द्याव्यात, […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

दहशतवादी हल्ल्यावर संसदेचे विशेष अधिवेशन नाकारल्याबद्दल माकपची केंद्रावर टीका

’ऑपरेशन सिंदूर’वर पारदर्शकतेची मागणी; सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागाची तयारी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यास नकार दिल्याने भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) — माकप — ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पॉलिट ब्युरोच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात, पक्षाने या भूमिकेचा निषेध करत तत्काळ संसदेचे अधिवेशन बोलवण्याची आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

माजी आमदार अमित घोडा यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

ग्रामीण भागात सेनेला नवी ताकद; ‘आमदार आपल्या दारी’ राज्यभर राबवा – एकनाथ शिंदे By संतोष पाटील पालघर : पालघर जिल्ह्यातील माजी आमदार अमित घोडा यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेत पुन्हा ‘घरवापसी’ झाल्याची चर्चा असून, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. […]