ताज्या बातम्या महाराष्ट्र

Amravati Lok Sabha : बच्चू कडू यांचा इशारा, मुख्यमंत्र्यांसोबत आज मुंबईत बैठक; नवनीत राणांचा पत्ता कट होणार?

अमरावती : प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बच्चू कडून यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. ३ एप्रिल रोजी प्रहार अमरावतीतून अर्ज भरणार, आमचा निर्णय पक्का आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. याशिवाय त्यांनी वर्ध्यातून लढण्याचे संकेतही दिले आहेत. त्यांना कार्यकर्त्यांकडून वर्ध्यातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला जात आहे. मात्र महायुती मान-सन्मान ठेवत नसेल तर आम्ही बाहेर पडू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

रविवारी सायंकाळी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार कडून यांना फोन करून मुंबईत भेटीचं निमंत्रण दिलं होतं. यानंतर आज २६ मार्च रोजी कडू आणि मुख्यमंत्र्यांची भेट होणार आहे.

महायुतीत मात्र धुसफूस
भाजपने आतापर्यंत २३ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. गेल्या लोकसभेत जिंकलेली पूनम महाजन यांच्या जागेवरुन अद्याप कोणत्याच उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र भाजपकडून आणखी सहा जागांवर दावा केला जात आहे. त्यापैकी एक जागा अमरावतीची आहे. अमरावतीतून आमचाच उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. तर या जागेसाठी अपक्ष उमेदवार नवनीत राणा, याशिवाय प्रहार संघटनेचे बच्चू कडू आग्रही आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री व भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी या मतदारसंघातून त्यांचाच (भाजप) उमेदवार राहणार असल्याचे म्हटले असले तरी उमेदवाराबद्दल कमालीची गोपनीयता बाळगली आहे. भाजपला समर्थन देणाऱ्या विद्यमान खासदारांना उमेदवारीची अपेक्षा असताना भाजपमधूनच माजी महापैार संजय नरवने व सिद्धार्थ वानखडे यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे यांच्याविरोधात महायुती कोणतं नाव उभं करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात