महाराष्ट्र ताज्या बातम्या

Arvind Kejriwal : राजकीय प्रतिस्पर्धी असलेली काँग्रेस केजरीवालांच्या पाठीशी

X: @therajkaran

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटकेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. दिल्लीत राजकीय प्रतिस्पर्धी असलेली काँग्रेस (Congress) या संकटात केजरीवालांच्या मागे उभी राहिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi )हे केजरीवाल कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. ईडी विरुद्धच्या न्यायालयीन लढाईत केजरीवालांची मदत करणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे.

कथित मद्य घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ED) काल केजरीवाल यांना अटक केली. ही अटक म्हणजे विरोधकांच्या राजकीय छळाचा भाग आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं आहे. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी लवकरच केजरीवाल किंवा त्यांच्या कुटुंबीयांना भेटून पुढील कायदेशीर बाबींवर चर्चा करणार आहेत. केजरीवाल यांच्या अटकेनंतर काँग्रेसनं केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भेकड हुकूमशहा मृत लोकशाही जन्माला घालण्याचा प्रयत्न करत आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.

घाबरलेला हुकूमशहा मृत लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मीडियासह सर्व संस्था ताब्यात घेणं, पक्ष फोडणं, कंपन्यांकडून पैसे उकळणं, प्रमुख विरोधी पक्षाची खाती ‘गोठवणं’ हे सगळं करूनही या असुरी शक्तीची भूक भागलेली नाही. त्यामुळं आता निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक केली जात आहे. त्यांच्यासाठी हा सगळा खेळ झाला आहे. ‘इंडिया’ आघाडी (INDIA) याला चोख प्रत्युत्तर देईल,’ असं राहुल यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात