मुंबई
लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असताना काँग्रेसला मोठं खिंडार पडताना दिसत आहे. काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. असं असताना चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मोठे संकेत दिले. काँग्रेसचे मोठे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं फडणवीसांनी दिले. काँग्रेसमध्ये नेत्यांची घुसमट होत आहे. त्यामुळे ‘आगे आगे देखीये होता है क्या’ अशा शब्दात फडणवीसांनी संकेत दिले.
काँग्रेसचे माजी नगरसेवक जगन्नाथ कुट्टी आणि राजेंद्र नरवणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. काँग्रेसमधील मोठे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला.