मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली असताना अनेक इच्छुक उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. यापार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha constituency) राजकीय घडामोडीना वेग आला आहे .या मतदारसंघात आता आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade )यांनी ताराराणी पक्षाच्या वतीने निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे . त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या मतदारसंघात आता पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे .
याआधी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना , शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील रिंगणात आहेत .आता त्यात ताराराणी पक्षानेही उडी घेतली आहे . महायुतीने शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांना उमेदवारी दिली आहे .तर मविआकडून ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील (Satyajeet Patil) यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी (Raju Shetti) मैदानात आहेत. तर रघुनाथदादा पाटील (Raghunath Patil) यांनी कोल्हापूर, हातकणंगलेसह (Hatkanangale) नऊ जागांवर भारतीय जवान किसान पार्टी निवडणूक लढवणार असलयाचे सांगितले आहे .त्यानंतर आता आमदार प्रकाश आवाडे हे सुद्धा निवडणूक रिंगणात उतरले आहेत .त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे.
दरम्यान याआधी प्रकाश आवाडे हे हातकणंगलेमधून त्यांच्या मुलाला भाजपाकडून उमेदवारी मिळवून देण्यासाठी इच्छूक होते. तसेच त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नही केले होते. मात्र हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सुटला, तसेच त्यांनी येथून विद्यमान खासदार धैर्यशिल माने यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे प्रकाश आवाडे नाराज झाले होते . यानंतर आता ते स्वतः या मतदारसंघातून निवडूक लढवणार आहेत . याबाबत बोलताना ते म्हणाले , या आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी पाठींबा देणार आहे. हा मतदारसंघ माझ्या पूर्ण परिचयाचा आहे . तसेच इचलकरंजी येथील एकही माणूस माझ्या शब्दाबाहेर बाहेर जाणार नाही त्यामुळे हेच परिवर्तन संपूर्ण लोकसभा मतदारसंघात करणार आहे . या मतदारसंघातून एकदाच निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला . .