महाराष्ट्र ताज्या बातम्या

विदर्भातील विरोधी पक्षनेत्याला विदर्भाच्या प्रश्नांचा विसर पडला : देवेंद्र फडणवीस

X : @therajkaran

नागपूर

संपूर्ण हिवाळी अधिवेशनात विदर्भासाठी (Vidarbha) चर्चेचा एकही प्रस्ताव विरोधी पक्षांनी दिला नाही. अंतिम आठवडा प्रस्ताव हा विदर्भावरील चर्चेचा असायला हवा होता. इतिहासाचे दाखले तसेच आहेत. मात्र विरोधी पक्षाला विदर्भाचा विसर पडला, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत केला. 

पोलीस विभागाचा नवा आकृतीबंध या सरकारने तयार केला असे त्यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत होते. विरोधी पक्षनेते विदर्भाचे आहेत तरी हे व्हावे याचे नवल वाटले. ड्रग्स संदर्भात चोवीस हजार आरोपींवर कारवाई झाली. पोलीस दलात २३ हजार पेक्षा जास्त अशी अभूतपूर्व भरती झाली (Recruitment in police force) आहे, अशी माहिती त्यांनी दिली. एनसीआरबीचा अहवाल वाचायला शिका, असा टोला लगावताना महाराष्ट्र राज्याचा क्रमांक गुन्हेगारीत पहिला हा आरोप त्यांनी आकडेवारी देत खोडून काढला.

महाराष्ट्र सायबर प्रोजेक्ट (Cyber project) हा डायनामिक प्लॅटफॉर्म, सायबर गुन्हे रोखण्यासाठी निर्माण करण्यात येत आहे असेही त्यांनी जाहीर केले. आपण सरकारमध्ये आल्यापासून नागपूर (Nagpur) शहराचे नाव गुन्हेगारीत पुढे अशी टीका काही लोक करतात. मात्र अशा प्रचाराचा दुष्परिणाम गुंतवणूकीवर होऊ शकतात. वैनगंगा -नळगंगा प्रकल्पासंदर्भातील सर्व तरतुदी आपण मुख्यमंत्री असताना पूर्ण केल्या होत्या. परंतु नंतरच्या सरकार काळात तो कॅबिनेट बैठकीत आला नाही. आम्ही हा मंत्रिमंडळापुढे आणू असेही त्यांनी सांगितले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात