महाराष्ट्र ताज्या बातम्या

देशद्रोहयाच्या मांडीला मांडी लावून बसले; अंबादास दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

X: @therajkaran

नागपूर:

राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा सदस्य माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसण्याच्या घटनेचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक झडली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी हा विषय उपस्थित केला. सत्ताधारी सदस्यांनीच मलिक यांच्या विरोधात पूर्वी केलेल्या वक्तव्यांचे स्मरण करून दिले. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Home Minister Devendra Fadnavis) यांनी “तुमच्या नेत्यांनी ते कारागृहात असतांना मंत्रिपदावरून का वगळले नाही?” असा प्रश्न उपस्थित करत दानवे यांना टोला लगावला. देशद्रोही

सुटकेनंतर नवाब मलिक हे शरद पवार गट की सत्तेत गेलेल्या अजित पवार गट, कोणासोबत जातील यावरून चर्चा रंगल्या होत्या. मलिक हे आज हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात (Nagpur winter session) उपस्थित झाले. मात्र, त्यांनी अजित पवार यांच्या गटाच्या (Ajit Pawar group of NCP) बाकावर बसण्यास पसंती दिली. त्यावरून हा सभागृहात व बाहेरही चर्चेचा विषय झाला. त्याचेच पडसाद विधान परिषदेत उमटले.

विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले की, विधानसभेचे एक सदस्य आज सत्ताधारी बाकावर बसले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती. देशद्रोह्यांच्या (Traitor) ‘मांडीला मांडी’ लावून बसू शकत नाही, असे म्हणाले होते; पण आज तेच यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. अंबादास दानवे यांच्या या विधानावर सत्ताधारी बाकावरील मंत्री शंभुराज देसाई व इतर आमदारांनी गदारोळ केला. त्यावर संतप्त दानवे म्हणाले, मला बंधन घालणारे आपण कोण? या प्रकरणी आंतरराष्ट्रीय आतंकवादी कुख्यात दाऊद इब्राहिम याच्याशी कोणते व्यवहार झाले? एवढे जाणून घेण्याची इच्छा आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ म्हणाले, एका गोष्टीचे आश्‍चर्य आहे, ज्यांच्या नेत्यांनी ती व्यक्ती कारागृहात असताना मंत्रिपदावरून काढले नाही, ते आता येथे वेगळी भूमिका मांडत आहेत.

Also Read: अबब ! ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात