ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड : मराठा समाजाच्या मोर्चाकडे शिंदे – फडणवीस – अजित पवार गटाची पाठ

Twitter: @milindmane70

महाड

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीहल्ल्याच्या विरोधात महाडमध्ये मराठा समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला. मात्र, सत्ताधारी एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस व अजित पवार गटातील नेत्यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवल्यामुळे स्थानिक मराठा समाज नाराज झाला आहे. निवडणुकीत तुम्हाला जागा दाखवू असा इशारा स्थानिक मराठा समाजातील नेत्यांनी दिला आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा काढून प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चात तालुक्यातील रायगड, पाचाड, नाते विभाग, वरंध, बिरवाडी वाळण, विन्हेरे करंजाडी, खाडीपट्टा विभाग, दासगाव आणि महाड शहर परिसरातून मराठा समाजातील महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चेकऱ्यांनी प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांना निवेदन दिले. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आली.

सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष यांच्यासह शिंदे गटातील विद्यमान आमदार भरत गोगावले व त्यांच्या समर्थकांनी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील मराठा समाजातील पुढार्‍यांनी मोर्चात अनुपस्थिती दाखवल्याबद्दल मराठा समाजातील नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली गेली.

येणाऱ्या निवडणुकीत मते मागायला याच, मग आम्ही तुम्हाला याचा जाब विचारतो, अशा प्रतिक्रिया मराठा समाजातील अनेक मंडळींनी यावेळी बोलून दाखवल्या. मराठा मोर्चामध्ये चंद्रकांत बुवा जाधव, पद्माकर मोरे, धनंजय देशमुख, श्रेयश जगताप, राजू रेवणे, सतीश सकपाळ, अशोक माने, श्रीधर सकपाळ, चेतन पोटफोडे, अमित मोरे, राजेंद्र कोरपे, महेश महाडिक आदी मराठा समाजातील बांधव उपस्थित होते. या मोर्चाच्या वेळी महाडमधील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात