नवी दिल्ली
१४ जानेवारीपासून काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्राला सुरुवात होणार आहे. ही यात्रा १४ जानेवारी ते २० मार्चपर्यंत असणार असून राहुल गांधी या न्याय यात्रेचं नेतृत्व करतील. या यात्रेत ६७०० किलोमीटरहून अधिक प्रवास केला जाणार आहे. ६७ दिवस, ११० जिल्हे, १०० लोकसभा, ३३७ विधानसभेचा दौरा या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने केला जाणार आहे.
दरम्यान काँग्रेसकडून याचा रूट मॅप जाहीर करण्यात आला आहे. काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा प्रवास कुठून कुठपर्यंत असेल याची माहिती दिली.
भारत जोडो न्याय यात्राचा रूट मॅप
- मणिपुर | 107 किमी | 4 जिल्हे
- नागालँड | 257 किमी | 5 जिल्हे
- असम | 833 किमी | 17 जिल्हे
- अरुणाचल प्रदेश | 55 किमी | 1 जिल्हा
- मेघालय | 5 किमी | 1 जिल्हा
- पश्चिम बंगाल | 523 किमी | 7 जिल्हे
- बिहार | 425 किमी | 7 जिल्हे
- झारखंड | 804 किमी | 13 जिल्हे
- उड़ीसा | 341 किमी | 4 जिल्हे
- छत्तीसगढ़ | 536 किमी | 7 जिल्हे
- उत्तर प्रदेश | 1,074 किमी | 20 जिल्हे
- मध्य प्रदेश | 698 किमी | 9 जिल्हे
- राजस्थान | 128 किमी | 2 जिल्हे
- गुजरात | 445 किमी | 7 जिल्हे
- महाराष्ट्र | 480 किमी | 6 जिल्हे
दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांची कन्या आणि वायएसआरटीपीच्या संस्थापक वायएस शर्मिला यांनी गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शर्मिलाचा पक्ष YSRTPही काँग्रेसमध्ये विलीन झाला. यावेळी त्या म्हणाल्या की, राहुल गांधी देशाचे पंतप्रधान व्हावेत हे तिच्या वडिलांचे स्वप्न होते आणि त्यात योगदान दिल्यास मला आनंद होईल. आता भाजपने वायएस शर्मिला यांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला आहे.