ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश, सरकारकडून सर्व मागण्या मान्य

नवी मुंबई

मराठा आरक्षणाच्या लढाईला अखेर यश आलं असून मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारने मध्यरात्री याबाबतच बैठक घेऊन पहाटे अध्यादेश काढला असून तो जरांगे पाटलांकडे पाठवण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या सर्व मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलं. याशिवाय समाज म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला, त्यांनी चांगलं काम केलं, असंही पाटील यावेळी म्हणाले.

  • कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे.
  • सरकारने सगेसोयऱ्यांबद्दल अध्यादेश काढला आहे.
  • राज्यातील मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घेण्याची राज्य सरकारची तयारी
  • वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे.
  • विधानसभेत यावर कायदा तयार करण्यात येणार आहे.

दरम्यान राज्य सरकारने सर्व कागदपत्रे मनोज जरांगे यांना दिली असून त्यांनी उपोषण सोडावे अशी विनंती मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, मनोज जरांगेंनी खूप मोठी लढाई आपल्या समाजासाठी लढली, मनोज जरांगेंच्या लढ्याला यश आले आहे. आज नवी मुंबईत मनोज जरांगे पाटील विजयी सभा घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी यावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात