Twitter : @therajkaran
मुंबई
पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ राजकारणी आहेत असं मी इतके दिवस मानत होतो. पण आज राज्यात कॉंग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली, त्याला कारण चव्हाणच आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (NCP State President MP Sunil Tatkare) यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम करण्यासाठी सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आले होते, असा गौप्यस्फोटही सुनिल तटकरे यांनी आज केला.
मराठा आरक्षण (Maratha reservation) राष्ट्रवादी कॉँग्रेसमुळे उच्च न्यायालयात (High Court) टिकले नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली. त्यामुळे संतप्त झालेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चव्हाण यांचीवर तोंडूसख घेताना गडे मुडदे उखाडले आहेत. तटकरे म्हणाले, “२०१४ च्या निवडणुकीत (2014 Assembly elections) राष्ट्रवादी काँग्रेसने मागितलेल्या जागांवर कॉंग्रेसने (Congress) परस्पर उमेदवार जाहीर केले. मी त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होतो. आम्हाला गाफील ठेवून कुठल्या जागा हव्यात याची माहिती काढून घेतली आणि कॉँग्रेसचे उमेदवार त्या जागांवर उभे केले.”
तटकरे पुढे म्हणाले, आतापर्यंतचा प्रघात असा आहे की निवडणूकपूर्व दोन राजकीय पक्षांची युती किंवा आघाडी होत असते, त्यानंतर उमेदवार यादी घोषित केली जाते. परंतु, पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम करण्यासाठी सुपारी देऊनच दिल्लीतून पाठवण्यात आले होते, त्यामुळेच निवडणूक पूर्व युती (Pre election alliance) होऊ शकली नाही. त्यानंतर मी, प्रफुल पटेल व अजित पवार यांनी राजभवनावर (Raj Bhavan) जाऊन निवडणूका सोबत लढणार नसल्याचे सांगितले. परंतु, तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे सत्तेला चिकटून राहण्याला अर्थ नव्हता, म्हणून आम्ही शिर्षस्थ नेतृत्वाकडे चर्चा करून सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आज कॉंग्रेस राज्यात चौथ्या क्रमांकावर गेली, त्याला कारण पृथ्वीराज चव्हाण आहेत असा हल्लाबोलही सुनिल तटकरे यांनी केला.