ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘लोकशाही’ भावपूर्ण श्रद्धांजली! आमदार अपात्रता निकालावर संतापलेल्या राऊतांचं ट्विट

मुंबई

आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल लोकशाही विरोधात असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला आहे. ही मॅच फिक्स होती असंही ते यापूर्वी म्हणाले आहेत. आज त्यांनी स्वत:च्या सोशल मीडियावरुन एक फोटो पोस्ट केला आहे. लोकशाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारा हा फोटो आहे. यात १९५० – २०२३ असं वर्ष लिहिलं असून शोकाकुलच्या पुढे महाराष्ट्राचा उल्लेख करण्यात आला आहे.

१० जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर केला आणि राज्यभरात गोंधळ उडाला. ठाकरे गटाने हा निकाल लोकशाहीविरोधात असल्याची टीका केली. यावेळी अध्यक्षांनी शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं जाहीर केलं. याशिवाय शिंदे यांनी विधीमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती जाहीर केली होती ती योग्य असून ठाकरे गटाला त्यांचा व्हिप पाळावा लागेल असंही दिसून येत आहे.

काल आमदार अपात्रतेच्या निकालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केल्याचा घणाघात राऊतांनी यावेळी केला. राहुल नार्वेकरांनी लोकशाहीची हत्या केली आहे आणि संविधानाचा अपमान केल्याचा आरोप राऊतांनी केला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात