ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘खासगी कंपन्यांना नफा मिळवून देणारा उद्योग बंद करा’, वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

मुंबई

सारथी, बार्टी, महाज्योतीच्या पीएचडी फेलोशीपच्या प्रवेश परीक्षेत सीलबंद पेपर न दिल्याने पुणे आणि नागपूरमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर बहिष्कार टाकला आणि पेपरफुटीचा प्रकार असल्याचा दावा केला आहे. यानंतर राज्यभरातून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. राज्यात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीची प्रकरणं पाहता विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात असल्याचं म्हटलं जात आहे.

यावर विरोधकांनीही चौकशीची मागणी केली आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे आणि राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर सरकारने श्वेत पत्रिका काढावी तसेच सर्व परीक्षा एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात याव्यात अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यातील बेरोजगारांचे भवितव्य घोटाळेबाजांच्या दावणीला बांधल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, सरकारने खासगी आयटी कंपन्यांना नफा मिळवून देण्याचा उद्योग बंद करायला हवा. सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यातील बेरोजगारांचे भवितव्य घोटाळेबाजांच्या दावणीला बांधले गेले आहे.

पेपरफुटीची वाढती प्रकरणे लक्षात घेता पारदर्शक पद्धतीने परीक्षा होण्यासाठी टी.सी.एस. व इतर कंपन्यांना देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करण्यात यावी. पेपर फुटीचा आरोप होत असलेली सध्याची तलाठी पद भरती रद्द करावी. या परीक्षेसंदर्भात होत असलेल्या आरोपांची सरकारने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. या संपूर्ण पद भरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात