ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची तिकीटं पाठवली थेट सोनिया आणि राहुल गांधींना? कुणी केलाय हा प्रताप?

मुंबई – लोकसभेच्या तोंडावर रणदीप हुडा आणि अंकिता लोखडे यांची प्रमूख भूमिका असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. हिंदी आणि मराठीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांना पहिल्या दिवशी महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. ,स्वातंत्र्यवीर सावरकरांवर माफीवीर अशी टीका करणाऱ्या काँग्रेसला डिवचण्याची संधी या निमित्तानं भाजपानं घेतलेली आहे. उजव्या विचारसरणीच्या अनेकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचं आवाहन केलेलं आहे. काश्मीर फाईल्स सिनेमाचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यानंही ट्विट करत हा सिनेमा पाहण्याचं आवाहन केलेलं आहे.

सोनिया, राहुल गांधींना पाठवली सिनेमाची तिकीटं

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजंदर सिंग तिवाना यांनी डिवचलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाची तीन तिकिट काढत राहूल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना पाठवली आहेत. हा सिनेमा पाहून स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतचे गैरसमज दूर करुन घ्यावेत, असं आवाहनही यानिमित्तानं करण्यात आलेलं आहे. यासोबत पॉपकॉर्न आणि कोल्डड्रिंकचे कुपनही गांधी कुटुंबीयांना पाठवण्यात आलेत.

पक्षाचं खातं गोठवल्यावरुनही टीका

काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवल्यानं, गांधी कुटुंबीयांकडे पॉपकॉर्न आणि कोल्ड ड्रिंकचेही पैसे नसतील. त्यामुळे त्यासाठीही मोफत कुपन पाठवल्याचं तिवाना यांनी सांगितलंय.

मुंबईच्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर मुद्दा

राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचा समारोप काही दिवसांपूर्वीत मुंबईत शिवाजी पार्कावर झाला. या निमित्तानं इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळालं. या सभेपूर्वी राहुल गांधी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शक्तीस्थळाला अभिवादन केलं होतं. मात्र शिवाजी पार्कासमोर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात राहुल गांधींना उद्धव ठाकरेंनी का नेलं नाही, असा सवाल भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांनी उपस्थित केलेला होता.

सावरकरांच्या वंशजांकडूनही रणदीप हुडाचं कौतुक

स्वातंत्र्यवीर सावरकारांचे पणतू आणि सावरकर स्मारकाचे अध्यक्ष रणजीत सावरकर यांनी सावरकरांबाबत सिनेमावरुन समाधान व्यक्त केलंय. या सिनेमाच्या माध्यमातून सावरकर यांच्या कार्याचा खरा परिचय देशवासियांना होईल, असं त्यांचं म्हणणंय. काँग्रेसच्या काळात सशस्त्र क्रातिकारकांच्या कार्याचा गौरव झाला नाही. या चित्रपटाच्या निमित्तानं हा इतिहास देशासमोर येईल असं त्यांनी सांगितलंय.

हेही वाचाःबारामतीतला संघर्ष आणखी तीव्र, शिवतारेही रिंगणात, थोपटेंनंतर आता पवारांचा आणखी एक विरोधक गळाला?

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे