अतिवृष्टीमुळे महाड शहरातील मुख्य बाजारपेठेत शिरलेले पुराचे पाणी आणि जलमय झालेला रस्ता. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सावित्री, गांधारी, काळसह उपनद्यांत गाळ काढूनही महाडला पुराचा फटका; जनजीवन विस्कळीत

मुख्य बाजारपेठ जलमय; साहिलनगरमध्ये घर कोसळले, केंबुर्लीजवळ पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली महाड: सावित्री, गांधारी, काळ आणि अन्य उपनद्यांमधील गाळ काढण्याचे काम करूनही यंदाच्या अतिवृष्टीत महाड शहराला पुन्हा एकदा पुराचा मोठा फटका बसला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, अनेक रस्ते आणि सखल भाग जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा […]

टीवायबीकॉम पेपरफुटीप्रकरणी सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील कुलगुरू कार्यालयासमोर आंदोलन करताना अभाविपचे विद्यार्थी कार्यकर्ते. मुंबई ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठ पेपरफुटीप्रकरण : राज्य सरकारच्या सीआयडी चौकशीच्या सूचनेकडे दुर्लक्ष? कुलगुरूंच्या दालनासमोर अभाविपचे आंदोलन

टीवायबीकॉम प्रश्नपत्रिका गळतीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी; सीआयडी चौकशी न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा मुंबई: मुंबई विद्यापीठातील कथित टीवायबीकॉम अंतिम सत्राच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याबाबत राज्य सरकारने महाराष्ट्र विधानपरिषदेत स्पष्ट सूचना दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आक्रमक झाली आहे. राज्य सरकारच्या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सीआयडी […]

Villagers carrying a patient through difficult terrain in a remote tribal region of Maharashtra to access healthcare services. महाराष्ट्र ताज्या बातम्या विश्लेषण शोध बातमी

आदिवासींचा महाराष्ट्र – भाग ४

जीवन आणि उपचार यांच्यातील अंतर मुंबईत एखाद्या मुलाला अचानक ताप येतो. काही मिनिटांतच पालक डॉक्टरांना फोन करू शकतात. जवळच्या दवाखान्यात जाऊ शकतात. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात पोहोचू शकतात. आरोग्यसेवा अगदी हाताच्या अंतरावर असते. आता याच तापाची कल्पना नंदुरबार, पालघर किंवा मेळघाटमधील एखाद्या दुर्गम आदिवासी पाड्यावर करा. आजार तोच आहे. धोका तोच आहे. पण उपचारापर्यंतचे अंतर वेगळे आहे. अनेक आदिवासी कुटुंबांसाठी पहिली अडचण […]

महाराष्ट्रातील सामाजिक न्याय धोरणे आणि अनुसूचित जाती वर्गीकरणावरील चर्चेचे प्रतीकात्मक चित्रण महाराष्ट्र ताज्या बातम्या

जाहिरातीतून उमटले उपवर्गीकरणाचे संकेत? सरकारचा प्रशासकीय प्रयोग की नव्या राजकीय समीकरणांची चाचपणी?

राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणा घुमतात, तर कधी आंदोलनांचे वादळ उठते. पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्याही ओळींतून राजकीय आणि सामाजिक चर्चेची नवी ठिणगी पडू लागली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशाच्या जाहिरातीत अनुसूचित जाती (SC) या मुख्य संवर्गासोबत “मांग” आणि “मेहतर” या स्वतंत्र नोंदी दिसल्या आणि राज्याच्या सामाजिक व राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले. […]

दुर्गम आदिवासी गावात आशा सेविका एका बालकाची पोषण तपासणी करताना. ताज्या बातम्या महाराष्ट्र विश्लेषण शोध बातमी

आदिवासींचा महाराष्ट्र – भाग ३

अशक्तपणाची पिढी : कुपोषणाची सावली अजूनही आदिवासी बालपणाचा पाठलाग का करते? कुपोषणाची सुरुवात अनेकदा मुलाच्या जन्मानंतर होत नाही, तर त्याच्या जन्माआधीच होते. आदिवासी महाराष्ट्रातील अॅनिमिया, खुंटलेली वाढ, कमी वजन आणि पोषण योजनांच्या वास्तवाचा वेध घेणारा विशेष लेख. एखादे मूल चालायला शिकण्याच्या खूप आधी, बोलण्याच्या खूप आधी, शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवण्याच्या खूप आधी त्याच्या आयुष्याची एक […]

महाराष्ट्र विधानभवन, आचारसंहितेचे प्रतीकात्मक दस्तऐवज, कर्जमाफी आणि शैक्षणिक सवलतींसंबंधी सरकारी फाइल्स दर्शविणारे संपादकीय चित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

आचारसंहितेतच मोठ्या घोषणा कशा?: अनंत गाडगीळ यांचा सवाल  

मुंबई: महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी ३६ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा आणि नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन विकासासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद यांसारखे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय जाहीर कसे करण्यात आले, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना […]

दुर्गम आदिवासी भागात बांबूच्या डोल्यातून नदी ओलांडून रुग्णाला उपचारासाठी नेताना ग्रामस्थ. महाराष्ट्र ताज्या बातम्या विश्लेषण शोध बातमी

आदिवासींचा महाराष्ट्र : जन्मापासूनच मागे? मातृ आणि बाल आरोग्य हेच सर्वात मोठे आव्हान का?

आकडेवारीच्या पलीकडे, उपायांच्या दिशेने भाग २ : जन्मापासूनच मागे? मातृ आणि बाल आरोग्य हेच आदिवासी महाराष्ट्राचे सर्वात मोठे आव्हान का? मुंबईत राहणाऱ्या गर्भवती महिलेसाठी प्रसूती म्हणजे साधारणपणे एका फोनपासून सुरू होणारी प्रक्रिया असते. रुग्णवाहिका उपलब्ध असते. जवळच रुग्णालय असते. प्रशिक्षित डॉक्टर आणि परिचारिका काही मिनिटांच्या अंतरावर असतात. गुंतागुंत निर्माण झाली तरी उपचाराची व्यवस्था तत्काळ मिळू शकते. […]

लाखो शिवभक्त ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड किल्ल्याकडे जाताना; भगवे ध्वज आणि उत्साहपूर्ण वातावरण. महाराष्ट्र ताज्या बातम्या

३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल; जयघोषाने दुमदुमला गड

देश-विदेशातून शिवप्रेमींची रायगडावर गर्दी; संभाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या उपस्थितीत आज ऐतिहासिक सोहळाBy Milind Mane महाड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर लाखो शिवभक्तांनी गर्दी केली असून संपूर्ण गड परिसर शिवमय झाला आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय लोकोत्सवाला राज्यासह देश-विदेशातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहत […]

किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले साखर निर्यात बंदीविरोधात भूमिका मांडताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

साखर निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्या : किसान सभा

मुंबई : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्रासह देशभरातील साखर उद्योगासाठी घातक असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणखी संकटात ढकलणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया किसान सभेने व्यक्त केली आहे. साखर निर्यातीवरील बंदी तातडीने मागे घेऊन साखर उद्योगाला दिलासा द्यावा, अशी मागणी किसान सभेच्या नेत्यांनी केली आहे. किसान सभेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौकेचा ताबा

मुंबई: भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला (MTDC) हस्तांतरित करण्यात आली आहे. लवकरच ही युद्धनौका देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीत आणली जाईल, शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ केली जाईल आणि नंतर समुद्रात बुडवली जाईल. यामुळे पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगद्वारे अथवा पाणबुड्यांच्या माध्यमातून समुद्राखालील या युद्धनौकेचे दर्शन घेता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी गनिमी काव्यासाठी मोक्याचे […]