साखर निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्या : किसान सभा
मुंबई : केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्रासह देशभरातील साखर उद्योगासाठी घातक असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणखी संकटात ढकलणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया किसान सभेने व्यक्त केली आहे. साखर निर्यातीवरील बंदी तातडीने मागे घेऊन साखर उद्योगाला दिलासा द्यावा, अशी मागणी किसान सभेच्या नेत्यांनी केली आहे. किसान सभेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, […]

