ताज्या बातम्या महाराष्ट्र

आंदोलन अजून संपलेलं नाही, ‘या’ समाजासाठीही लढा उभारणार, रायगडावरुन जरांगे पाटलांची मोठी घोषणा

रायगड मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाच्या लढ्याला यश आल्यानंतर आज ते रायगड दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा मसुदा जारी केला. यानंतर मनोज जरांगे पाटील आज रायगड दौऱ्यावर आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या काळात धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी काम […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विश्लेषण

राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रातून त्या 6 जागांवर कोणाची वर्णी?

मुंबई राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून २७ फेब्रुवारी रोजी १५ राज्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातून सहा जागा रिक्त होणार आहे. त्यामुळे या ६ जागांवर कोणाची वर्णी लागणार, यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. सध्या या ६ जागांपैकी ३ जागा सत्ताधारी पक्षाच्या आहेत तर मविआतील घटकपक्षाकडे ३ जागा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शेतकरी कंपनीचा शेतमाल आता अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवरून मोठ्या बाजारपेठेत जाणार – धनंजय मुंडे

मुंबई शेतकऱ्यांनी शेती विषयक विचार बदलले पाहिजेत, शेतीला उद्योग म्हणून पाहिले पाहिजे त्यादृष्टीने शेती केली पाहिजे तरच शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतील असे प्रतिपादन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. शेतकरी कंपनीचा शेतमाल आता अमेझॉन, फ्लिपकार्ट, हिंदुस्तान युनीलिव्हर, टाटा यांसारख्या मोठ्या बाजारपेठेत थेट जाणार आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफाॅर्मेशन (MITRA ), कृषी विभाग,मा.बाळासाहेब ठाकरे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘महिनाभराच्या 5 रुपयांच्या अनुदानासाठी 12 नियमांची लांबलचक यादी, दुध उत्पादक शेतकऱ्यांनी फिरवली पाठ’; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

मुंबई राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर पाच रुपयांचे अनुदान देत असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. त्यानुसार फक्त गायीच्या दुधासाठी महिनाभरासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. अनुदानाचा लाभ घेण्यासाठी बारा नियमांची लांबलचक यादी देण्यात आली आहे, यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘नितीशकुमार देशातील सर्वात मोठे पलटुराम’, काँग्रेसचा हल्लाबोल

मुंबई नितीश कुमार यांनी काल बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत एनडीए सरकारसोबत सत्ता स्थापन केली आणि नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकांना धक्का बसला. ममता बॅनर्जी, भगवंत मान यांच्यानंतर आता नितीशकुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आघाडीच्या भवितव्याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘महाविकास आघाडीचा सोंगाड्या म्हणजे संजय डाऊट’; शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंची जहरी टीका

मुंबई संजय राऊतांसह ठाकरे गटाचे अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात. ते घटनेविरोधात, बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री पदावर बसल्याचा आरोप राऊतांकडून केला जात आहे. दरम्यान यावर शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी जहरी टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीचा सोंगाड्या आहे, अशा शब्दात ज्योती वाघमारे यांनी टीकास्त्र सोडले. वाघमारे पुढे म्हणाल्या, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही’, सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांच्या पुस्तकाने खळबळ

नवी दिल्ली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर विविध आरोप केले जात असतानाच त्यांचे नातू रणजीत सावरकर यांच्या पुस्तकामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आज दिल्लीत रणजीत सावरकरांच्या ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकान नथुराम गोडसेने झाडलेल्या गोळ्या आणि महात्मा गांधीजींच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या वेगवेगळ्या होत्या, असा दावा करण्यात आला आहे. या […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

पुढील 7 दिवसात देशात CAA लागू होईल, केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा

नवी दिल्ली येत्या सात दिवसात देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करण्याचा दावा केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यात देशात खळबळ उडाली आहे. दक्षिण 24 परगणा येथील एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, ‘धार्मिक, सामाजिक आणि धोरणाचा विचार करूनच CAA लागू करण्यात येईल. CAA च्या अचानक अंमलबजावणीमुळे देशात तणावाची परिस्थिती निर्माण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली असून त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होईल असंही सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्यावर्षी २०२३ मध्ये शरद पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Video : अजितदादा अॅक्शन मोडवर, सकाळीच कोल्हापूरच्या तालमी क्रीडा अधिकाऱ्यांचा घेतली शाळा!

कोल्हापूर आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. अजित दादांनी सकाळी तालमीची पाहणी केली. क्रीडा अधिकाऱ्यांना तालमीत नसल्याचं पाहून दादांनी त्यांना फोन करून चांगलाच समाचार घेतला. वेळेवर उपस्थित न राहिल्याने दादांनी त्यांना वेळेची आठवण करून दिली. अजित पवारांनी गंगावेश तालमीला भेट दिली आणि येथील कुस्तीपट्टूंशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालमींना मदत करण्याचं […]