ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय विश्लेषण

राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा, महाराष्ट्रातून त्या 6 जागांवर कोणाची वर्णी?

मुंबई

राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून २७ फेब्रुवारी रोजी १५ राज्यात निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातून सहा जागा रिक्त होणार आहे. त्यामुळे या ६ जागांवर कोणाची वर्णी लागणार, यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.

सध्या या ६ जागांपैकी ३ जागा सत्ताधारी पक्षाच्या आहेत तर मविआतील घटकपक्षाकडे ३ जागा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत विरोधी पक्षाला आपला गड राखता येईल का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाराष्ट्रातील या ६ खासदारांचे सदस्यत्व संपणार
१ परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन
२ केंद्रीय मंत्री नारायण राणे
३ माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
४ काँग्रेसचे नेते कुमार केतकर
५ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण
६ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई

आता या सहा जागांवरील उमेदवार पुन्हा निवडणूक जाणार की याच्या जागेवर दुसऱ्याची वर्णी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोणकोणत्या राज्यांमध्ये निवडणूक होणार
महाराष्ट्र – ६
उत्तर प्रदेश -१०
बिहार – ६
पश्चिम बंगाल – ५
मध्य प्रदेश – ५
गुजरात – ४
आंध्र प्रदेश – ३
तेलंगणा – ३
राजस्थान – ३
कर्नाटक – ४
उत्तराखंड – १
छत्तीसगड – १
ओडिशा – ३
हरियाणा -१
हिमाचल प्रदेश – १

केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ राज्यांच्या ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
कसा असेल राज्यसभा निवडणूक कार्यक्रम…

  • अधिसूचना जाहीर होण्याची तारीख – ८ फेब्रुवारी.
  • अर्ज करण्याची मुदत – १५ फेब्रुवारी
  • उमेदवारांच्या अर्जांची छाननी – १६ फेब्रुवारी
  • अर्ज मागे घेण्याची तारीख – २० फेब्रुवारी
  • मतदान – २७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत.
  • मतमोजणी – २७ तारखेला सायंकाळी मतमोजणी व निकाल जाहीर.
Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे