ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील नगरपरिषदांतील 100 टक्के रिक्त पदांची भरती करा, विजय वडेट्टीवारांची सरकारकडे पत्र लिहून मागणी

मुंबई

राज्यातील नगरपरिषदातील संपूर्ण रिक्त पदे भरली पाहिजेत. परंतू सरकार एकूण रिक्त पदांच्या 40 टक्के पदांची भरती करत आहे. पेपरफुटीमुळे राज्यातील बेरोजगार परीक्षार्थी उमेदवार मेटाकुटीला आले आहेत. असे असताना फक्त 40 टक्के पद भरती करून सरकार बेरोजगार परीक्षार्थींवर अन्याय करत आहे. सरकारने बेरोजगारांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. नगरपरिषदातील संपूर्ण 100 टक्के रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रात 32 लाख उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. या सर्व तरूणांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. संपूर्ण रिक्त पदे भरण्याची सरकारची मानसिकता नाही. सरकारच्या या धोरणामुळे बेरोजगारांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारला बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यात रस नाही. या बेरोजगारांच्या संयमाची परीक्षा महायुतीचे सरकार घेत आहे.

परीक्षा घेणाऱ्या खासगी आयटी कंपन्यांचे हित जोपासण्याच्या नादात सरकार दंग आहे. सरकारला बेरोजगारांचा भवितव्याची काळजी नाही. पदभरती प्रक्रियेत, परीक्षा पद्धतीत सुसूत्रता आणण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे या पदभरती प्रक्रियेत सुसूत्रता, पारदर्शकता आणावी. रिक्त पदांची भरती करताना 100 टक्के रिक्त पदे भरावीत, अशी मागणी करत बेरोजगारांच्या संयमाचा बांध फुटला तर सरकारला झेपणार नाही, असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात