मुंबई जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

रत्नागिरी सिंधुदुर्गात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद नाही, नारायण राणेंच्या दाव्यानंतर महायुतीत खळबळ, विरोधकांनाही टीकेची संधी

मुंबई- रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ भाजपाचाच आहे, असं ठआसून सांगताना यात कुणी लुडबूड करु नये, असं वक्तव्य नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केलं. शिंदेंच्या शिवसेनेची ताकद किती आहे, असा प्रतिसवाल करत, मतदारसंघात भाजपाच वरचढ असल्याचं सांगताना राणेंनी शिंदेंच्या शिवसेनेची ताकद मतदारसंघात नसल्याचं म्हटलय. पक्षानं उमेदवारी दिली तर नक्की आपण ही जागा लढवू आणि जिंकून येऊ असा विश्वासही राणेंनी व्यक्त केलाय. नारायण राणे यांनी मतदारसंघावर दावा करताना शिंदेंच्या शिवसेनेवर केलेल्या टीकेनं महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. राणेंच्या या विधानाती गंभीर दखल शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली असून याबाबत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

किरण सामंत यांची माघार

दुसरीकडे या जागेवर तयारीत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी उमेदवारीतून माघार घेत असल्याची पोस्ट केली आहे. नरेंद्र मोदी यांना ४०० पेक्षा जास्त जागा मिळवून देण्यासाठी महायुतीत एकत्र काम करु असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. किरण सामंत यांनी उमेदवारीसाठी गेले दोन महिने बरेच प्रयत्न केले होते. राणे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या अ्नेक गाठीभेटी त्यांनी घेतल्या होत्या. मात्र भाजपा या जागेसाठी आग्रही असल्यानं अखेर त्यांनी माघार घेतलेली आहे.

राणेंनी दम दिल्यानं उमेदवारी मागे- वैभव नाईक

किरण सामंत यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सामंतांवर टीका केलीय.
सामंत यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कशाप्रकारे दम दिला. अशाप्रकारे लायकी काढली हे कोकणातल्या सर्व जनतेने पाहिला आहे आणि यानंतर किरण सामंत यांनी उमेदवारी मागे घेतली, अशी टीका नाईक यांनी केलीय. दम देऊन किरण सामंत यांनी उमेदवारी मागे घेतली पण दम देऊन रत्नागिरी सिंधुदुर्गातील लोक तुम्हाला मतदान करू शकत नाही, असा टोला त्यांनी नारायण राणेंनाही लगावलेला आहे. केंद्रीय मंत्री असताना कोकणासाठी काय काम केले याचा हिशोब कोकणातील जनता राणेंना विचारेल असंही नाईक यांनी म्हटलय. या मतदारसंघात खासदार विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचाःउत्तर मध्य मुंबईतून भाजपाला उमेदवार मिळेना? महाजन, शेलार की अळवणी?

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात