महाराष्ट्र ताज्या बातम्या

सर्पदंशाविरोधात मोठी पावले; अधिसूचित आजाराचा प्रस्ताव, तज्ज्ञांची राज्यस्तरीय बैठक होणार

Maharashtra Health Minister Prakash Abitkar addresses the Legislative Assembly while responding to a discussion on declaring snakebite a notifiable disease and strengthening public health measures.

मुंबई: राज्यात सर्पदंशाला अधिसूचित (Notifiable) आजाराचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात येईल, तसेच पावसाळी अधिवेशनानंतर केंद्र सरकारच्या तज्ज्ञांसह सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन सर्पदंश प्रतिबंध व उपचार व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

विधानसभा नियम १०५ अंतर्गत मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना आबिटकर बोलत होते.

भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी सर्पदंश ही राज्यातील गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या असल्याचे सांगत, दरवर्षी हजारो नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. विविध प्रकारचे विषारी सर्प असताना उपचारासाठी प्रामुख्याने एकाच प्रकारचे अँटी-स्नेक व्हेनम (ASV) उपलब्ध असल्याने काही वेळा उपचारात अडचणी निर्माण होतात, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

ज्या सर्पाच्या प्रजातीमुळे दंश झाला, त्याच प्रकारच्या विषावर आधारित लस उपलब्ध व्हावी, अशी मागणी करत पाचपुते यांनी राज्यात सध्या वापरली जाणारी लस प्रामुख्याने तामिळनाडूमधील सर्पांच्या विषावर आधारित असल्याचा मुद्दाही मांडला. तसेच सर्पमित्रांची मदत घेऊन व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचीही त्यांनी सूचना केली.

उत्तरात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असल्याचे सांगितले. “सर्पदंशामुळे मृत्यूचे प्रमाण सुमारे ०.१ टक्के आहे. मात्र लोकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने जनजागृतीवर भर दिला जात आहे,” असे ते म्हणाले.

राज्यात विषारी आणि बिनविषारी सर्प ओळखण्यासाठी आवश्यक किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून, उपचार व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तज्ज्ञांच्या सूचनांनुसार पुढील निर्णय घेतले जातील, असेही आबिटकर यांनी स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात