महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड-दापोली राज्य मार्गावर दोन एसटी बस घसरल्या; मोठी दुर्घटना टळली

Maharashtra State Transport (ST) bus tilted off the Mahad-Dapoli State Highway near Kurle village after skidding on a rain-soaked road, while passengers stand safely outside.

कुरले गावाजवळ पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवाशांनी आपत्कालीन दरवाजातून सुरक्षित बाहेर पडून टळला अनर्थ

महाड: महाड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर दिसू लागला असून, महाड-दापोली राज्य मार्गावरील कुरले गावाजवळ पुणे (पिंपरी-चिंचवड) आगाराच्या दोन एसटी बस घसरून रस्त्याच्या कडेला झुकल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ही घटना दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने दोन्ही बस रस्त्याच्या कडेला उतरल्या आणि एका बाजूला झुकल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बसमधील प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

अपघातांच्या मालिकेने वाढवली चिंता

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षीही महाड-दापोली राज्य मार्गावर पुणे आणि पिंपरी-चिंचवड आगाराच्या काही एसटी बस अपघातग्रस्त झाल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिकांनी या मार्गावर एसटी बसचा वेग, पावसाळ्यातील सुरक्षित वाहनचालक प्रशिक्षण, तसेच वाहनांच्या टायरची नियमित तपासणी याकडे परिवहन प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण काय होते, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Milind Mane

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात