महाराष्ट्र ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींनी खासदारांचा निधी थांबवून स्वतःसाठी विमान घेतलंय : विनायक राऊतांचा आरोप

X: @therajkaran

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी (Vinayak Raut) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोदींनी कोरोना काळात खासदारांचा 8000 कोटी रुपयांचा निधी थांबवून स्वतःसाठी 7500 कोटींचे आलिशान विमान घेतले असल्याचा आरोप राऊत यांनी kela आहे.

रत्नागिरी (Ratnagiri) १  सिंधुदुर्ग (Sidhudurg) लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार 101 टक्के पडणार ही गॅरंटी असल्याची टीका देखील राऊत यांनी केली आहे .

निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी भाजपला प्रचारप्रमुख गोव्यातून आणावे लागतात, अशी वेळ त्यांच्यावर आली असल्याची टीका करत राऊत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Savant ) यांच्यावरही निशाणा साधला आहे. सावंतांनी आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांवर अन्याय केला. त्यांच्या पोटावर पाय आणण्याचं काम केले, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

खासदार राऊत यांनी माजी आमदार प्रमोद जठारांच्या (Pramod Jathar) टिकेलाही चोख प्रत्युतर दिल आहे. यावर ‘हो, विनायक राऊत खलनायकच आहे, जठार तुमच्या दलालीला आळा घालण्यासाठी मी खलनायक आहे. आमच्या आघाडीमध्ये कोणीही अब्जोपती नेता नाही. आमच्या केंद्रीय मंत्र्यांचा दिल्लीत बंगला असून त्याचा सर्वसामान्य जनतेला काही उपयोग नाही. मात्र, माझं घर असून ते सर्वसामान्य जनतेला खुलं आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी विनायक राऊतची जेवढी जमीन होती, तेवढीच आहे. माझी जरा जरी जमीन वाढली, तरी राणे कुटुंबीयांना लाभो, असा टोला राणेंना (Rane) लगावला आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात