ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र मुंबई

विदर्भात आता आदित्य ठाकरे मैदानात, यवतमाळमधून महायुतीला देणार आव्हान

नागपूर – विदर्भात रणरणत्या उन्हात प्रचारही तापलेला आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरुन झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा आणि अर्ज भरण्याची लगबग सुरु झालीय. यातच ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचं बळ वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर दाखल झालेले आहेत.

यवतमाळमध्ये आदित्य ठाकरेंची प्रचार सभा

यवतमाळ वाशिम मतदारसंघात पाच टर्म असलेल्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा संधी मिळणार की नाही, याची अनिश्चितता असतानाच आदित्य ठाकरे यवतमाळमध्ये येतायेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरताना होत असलेल्या शक्तिप्रदर्शनात आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या प्रचारसभेत आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. यावेळी महायुतीत सुरु असलेल्या घोळाबाबत आणि भावना गवळी यांच्या भ्रष्टाचारावर आदित्य ठाकरे तोफ डागण्याची शक्यता आहे.

भावना गवळी किंवा संजय राठोड या दोघांपैकी महायुती एकाच्या नाववर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत या दोन्ही नेत्यांना आदित्य ठाकरे आजच्या सभेत लक्ष्य करतील.

मोदींचे अच्छे दिन म्हणजे एप्रिल फूल

नागपुरात पोहचल्यानंतर आदित्य ठाकरेंशी माध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकारवर चीकास्त्र सोडोलेलं आहे. त्यांनी एप्रिल फूलची तुलना मोदींच्या अच्छे दिन या घोषणेशी केली आहे. गेला दहा वर्षात देशात काय कामं झाली हे सर्वांना माहित आहे, असं सांगत जगात एप्रिल फुल हा दिवस साजरा होत असताना,आपल्याकडे तो अच्छे दिन म्हणून हा दिवस साजरा होतो. असा टोला त्यांनी लगावलेला आहे.

देशात परिवर्तन होणार- आदित्य

देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत, असं वक्तव्यही आदित्य ठाकरेंनी केलंय. दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, प. बंगाल या राज्यात इंडिया आघाडीची बांधणी मजबूत असल्याचं सांगत, या निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचाःएकनाथ खडसे भाजपात घरवापसी करणार? सुनेसाठी सासरे भाजपाच्या मैदानात?

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात