ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मनोज जरांगेंना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश, मराठा आंदोलनाला धक्का?

मुंबई

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात मनोज जरांगेंना न्यायालयात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मनोज जरांगे पाटील पुण्यातून प्रवास करीत असून उद्यापर्यंत ते मुंबईच्या वेशीवर पोहोचू शकतात. यावेळी मुंबईतूनही मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते मोर्चाच सहभागी होण्याची शक्यता आहे. आज गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर या याचिकेवरील सुनावणी पार पडली. राज्याचे महाधिवक्ता डॉ. रविंद्र सराफ देखील न्यायालयात उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यांच्या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. जरांगे पाटलांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी सदावर्तेंची प्रमुख मागणी आहे.

मनोज जरांगेंना अद्याप परवानगी नाही..
मुंबईत मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानासह कुठेही आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्यासह ओबीसी नेत्यांनी आंदोलनासाठी अर्ज केला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप कोणालाही परवानगी दिलेली नाही. जमाव एकत्र आला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीतील लाठीचार्जमध्ये २९ पोलीस जखमी झाले होते, याचाही दाखल सदावर्ते यांनी कोर्टात दिला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह कुठे एकत्र येणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

न्यायमूर्ती म्हणाले…
रोड ब्लॉक होणार नाही, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची सरकारने जबाबदारी घ्यावी. मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावावी. आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखील कळवण्यात यावे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात