मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना स्वातंत्र्यवीर सावरकर( Vinayak Damodar Savarkar) यांच्याविरोधात केलेलया वक्तव्याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाकडून त्यांना चांगलाच दणका दिला आहे . त्या वक्तव्याप्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी अशोक सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत सत्य असल्याचे आता पुणे पोलिसांनी सांगितले आहे . त्यावरून त्यांना 19 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पुण्यातील सत्र न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर राहुल गांधी स्वतः उपस्थित राहतात की वकिलामार्फत बाजू मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला होता. या आदेशाची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर पोलिसांनी आपला तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे.त्यामुळे आता राहुल गांधींच्या अडचणीत वाढ झाली आहे .
दरम्यान न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत राहुल गांधींच्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आलाय. तक्रारीनुसार, राहुल गांधींनी भाषणात म्हटले की, सावरकरांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं की, मी माझ्या 5-6 मित्रांसोबत जात एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती. अशा केल्यानं मला आनंद झाला होता. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचे खंडन केले होते. दरम्यान, राहुल गांधी आता पुणे सत्र न्यायालयात हजर होणार आहेत का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.