महाराष्ट्र ताज्या बातम्या

“…..तर ते महाराष्ट्रद्रोही म्हणून ओळखले जातील” : संजय राऊतांचे टिकास्त्र

X: @therajkaran

भारतीय जनता पक्ष (BJP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) संभाव्य युतीच्या चर्चेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी व शहा यांच्या पक्षाला कोणी मदत करणार असतील तर अशा लोकांची ओळख महाराष्ट्रद्रोही अशी राहील,’ असं म्हणत राऊतांनी टीकास्त्र सोडलं आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपनं आता मनसेलाही सोबत घेण्याची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्लीत गेले होते. यावर “मला बोलवलं म्हणून मी गेलो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मनसेला महायुतीत घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हं आहेत. यावर प्रतिक्रिया देताना खासदार राऊत यांनी मनसे किंवा राज ठाकरे यांचा थेट कुठंही उल्लेख केला नाही. मात्र, त्यांना जे काही सांगायचं होतं ते सांगून टाकलं.

ते म्हणाले, महाराष्ट्रावर आणि मराठी माणसांवर ज्यांचं प्रेम आहे ते भाजपसोबत जाण्याची भूमिका घेणार नाहीत असं मला वाटतं. तरीही, MNS टाइपचे काही पक्ष महाराष्ट्रात असतील आणि ते बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या विरोधात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी-शाहांना मदत करत असतील तर अशा पक्षांकडे महाराष्ट्रद्रोही म्हणून पाहिलं जाईल, असं राऊत यांनी ठणकावलं. 

‘लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड कायम राहील हे सत्ताधाऱ्यांना कळून चुकलंय. त्यामुळंच शिवसेनेच्या मतामध्ये फूट पाडून, गोंधळ निर्माण करून काही पदरात पाडून घेता येईल का, ही कारस्थानं दिल्लीत गेल्या काही काळापासून सुरू आहेत. कोणाबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. दिल्लीत जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. लोकशाही आहे. मात्र, त्यांना रात्री भेट मिळाली नाही, असंही मला कळलंय. महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे, शरद पवार व महाविकास आघाडीलाच यश मिळतंय या भीतीपोटी हे सर्व सुरू आहे, असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात