महाराष्ट्र ताज्या बातम्या

बीडमध्ये शरद पवारांना धक्का : शेकडो कार्यकर्त्यांचा ‘राष्ट्रवादी’त होणार प्रवेश

X: @therajkaran

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात फूट पडल्यापासून अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) गटाला सोडचिट्ठी दिली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. आता बीडमध्ये (Beed News) शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. बीडमधील  अनेक कार्यकर्त्यांचा आज अजित पवार गटात प्रवेश होणार आहे. 

बीड नगरपरिषदेचे माजी सभापती अमर नाईकवाडे, माजी उपनगराध्यक्ष फारुक अली पटेल, माजी उपनगराध्यक्ष मोईन मास्टर यांच्यासह अनेक कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता मुंबईत पक्षप्रवेश पार पडणार आहे.  त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे. बीड मधील एक मोठा गट अजित पवारांना (Ajit Pawar) पाठिंबा देत असल्यामुळे संदीप क्षीरसागर यांना मोठा फटका बसणार आहे. मुंबईत वाय बी चव्हाण सेंटर शेजारी असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

याआधी निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्ष व पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर अजित पवार गटाने पक्षबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले असून शरद पवारांनी (Sharad Pawar) पक्ष पुन्हा नव्याने उभारण्यासाठी जोर लावला आहे. त्यातच आता अजित पवार गटाने शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात