राज्यात निवडणूक काळात आत्तापर्यंत 7 कोटी 90 लाखांची दारु जप्त, ओल्या पार्ट्यांवर कारवाई, 4 हाजारांच्यावर गुन्हे दाखल
मुंबई- लोकसभा निवडणुका असो वा ग्रामपंचायत निवडणुका मतदारांना निरनिराळ्या प्दधतीनं आमिष, प्रलोभनं दाखवण्याचे प्रकार नेहमीच सर्रास सुरु असतात. या काळात सर्वाधिक वाटण्यात येतो तो पैसा आणि दारु. निवडणूक आयोगानं या लोकसभा निवडणुकीच्या काळात आारसंहिता लागू झाल्यापासून कठोर उपाययोजना केलेल्या दिसतायेत. ठिकठिकाणी पोलिसांची नाकेबंदी करण्यात आली असून, गाड्यांची झडती घेण्यात येतेय. निवडणुकांमध्ये वाहणारा दारुचा पूर रोखण्यात […]









