ताज्या बातम्या महाराष्ट्र

Uddhav Thackeray: शिंदे गटाच्या 10 आमदारांची उद्धव ठाकरे गटात घरवापसी : असीम सरोदेंच्या दाव्याने खळबळ

X: @therajkaran

शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला होता . मात्र आता त्यांच्यासोबत गेलेले दहा आमदार पुन्हा उद्धव ठाकरे गटात (Uddhav Thackeray Group) परत येणार असल्याचा दावा ज्येष्ठ वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने शिंदे गटाच्या अडचणीत वाढ होणार आहे.

एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या पलिकडे कोणी ओळखत नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपले काही भवितव्य नसल्याचे या आमदारांना कळल्याने त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावाही सरोदे यांनी केला आहे.

सरोदे यांनी या घरवापसी करणाऱ्या आमदारांची नावेच वाचून दाखविली. यात श्रीनिवास वनगा, लता सोनावणे, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, उदयसिंह राजपूत, प्रदीप जयस्वाल, महेश शिंदे आणि प्रकाश आबिटकर या आमदारांचा समावेश असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर शिंदे गटाला जोरदार धक्का बसणार आहे.

“राष्ट्रवादीचे (NCP) सुद्धा अनेकजण परत येणार अशी बातमी आली आहे. शरद पवारांकडे ते परत जाणार आहेत. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी हेच ठरवलं पाहिजे की विकला गेलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी, शरद पवारांनी ठरवलं नाही तर आम्ही मतदार ठरवणार की एकदा विकला गेलेला नेता पुन्हा निवडून देता येणार नाही. आपल्याला कुठेतरी थोडीफार इमानदारी शिल्लक असलेले लोक निवडून देता येतील. तसे लोक निवडून देण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे,” असं असिम सरोदेंनी म्हटलं आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात