महाराष्ट्र ताज्या बातम्या

शाळा बंद करून गरिबांना हद्दपार करणार का? — शिक्षक नेते कपिल पाटील यांचा सरकारला संतप्त सवाल

मुंबई — राज्यातील सुरु असलेल्या अनुदानित शाळा आर्थिक कारण देत बंद करण्याच्या हालचालींवर संतप्त प्रतिक्रिया देत, शिक्षक नेते आणि माजी आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, तसेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना सोमवारी एक कडक पत्र पाठवले. शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवत, हा निर्णय गरीबांच्या शिक्षणावर घाला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भारताकडे वाकड्या नजरेने पाहिलात, तर अद्दल घडवू – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा इशारा

नांदेड : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने जगाला आपली ताकद दाखवली आहे. भारताच्या दिशेने वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न जरी झाला, तरी आम्ही असा धडा शिकवू की सात पिढ्या लक्षात ठेवतील, असा सज्जड इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेडमध्ये जाहीर सभेतून दिला. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानिमित्त आयोजित या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामुळे कुठल्याही आपत्तीला व्यवस्थित तोंड देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : आपत्तीमध्ये काम करण्याला आमचं प्राधान्य आहे. आपत्तीचे राजकारण करणाऱ्यांना उत्तरं देत बसणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यातील सध्याच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील अद्ययावत अशा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आपत्कालीन कार्य केंद्र तंत्रज्ञानाने सुसज्ज असे झाल्याने कोणत्याही आपत्तीत शासनाला योग्य व्यवस्थापन करणे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतर्क; अतिवृष्टीग्रस्त भागांतील मदतकार्याला गती

मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने लक्ष ठेवून असून, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या भागांमध्ये तातडीने पंचनामे करून मदतकार्यास गती देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि आपत्ती निवारण कक्षाशी थेट संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिवसेनेची लांडगेतोड करणाऱ्याला बाळासाहेबांनी कधीच दारात उभं केलं नसतं – अंबादास दानवे

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेडमधील सभेत “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरसाठी पंतप्रधान मोदींना गळाभेट दिली असती,” असे विधान केल्यानंतर राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दानवे यांनी एका ट्वीटद्वारे म्हटले की, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जर हयात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड एसटी आगार पाण्यात बुडाले; काँक्रीटकरणाचे अयोग्य नियोजन ठरले कारणीभूत – विभाग नियंत्रक व आगार प्रमुख अपयशी

महाड – महाड एसटी आगारात अयोग्य नियोजनाखाली करण्यात आलेल्या काँक्रीटकरणाच्या कामामुळे संपूर्ण आगार परिसरात पावसाचे पाणी साचले असून, लाखो प्रवाशांना जीव मुठीत घेऊन बसमध्ये चढावं लागत आहे. या परिस्थितीसाठी विभाग नियंत्रक (पेण) व आगार प्रमुख फुलपगारे यांची दुर्लक्षवृत्ती व अपयश कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महाड आगारामध्ये काँक्रीटकरणाचे काम एका ठेकेदारामार्फत करण्यात आले. या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

खेड-दापोली रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि एसएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल करा – मनसेचे वैभव खेडेकर यांची मागणी

महाड – अवकाळी पावसामुळे खेड-दापोली रस्त्याची झालेली दुर्दशा ही पूर्णपणे निष्काळजी ठेकेदार आणि हलगर्जी अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचे फलित आहे, असा आरोप करत मनसेचे कोकण विभागीय नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे. खेड-दापोली रस्त्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपशासित महाराष्ट्रात सीमाभाग उपेक्षित, विरोधक असलेल्या कर्नाटक-तेलंगणात विकास, इथे खड्डे

नांदेड: तेलंगणा व कर्नाटकात भाजपची सत्ता नसतानाही या दोन्ही राज्यांनी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतचे रस्ते चकचकीत, सुसज्ज आणि प्रवासयोग्य केले आहेत. याउलट महाराष्ट्रातील सीमाभागातील रस्ते मात्र आजही खड्ड्यांनी भरलेले, धोकादायक आणि कायम दुर्लक्षित आहेत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर ते हाणेगाव (32 कि.मी.) हा प्रवास पार करण्यासाठी तब्बल दीड तास लागतो. यावरून या भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था स्पष्ट होते. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“सनातन विचारांवर आधारित राष्ट्रनिर्मिती ही संघाची दिशा” – पराग कंगले

मुंबई – “सनातन विचारधारेच्या आधारे राष्ट्राचे पुनरुत्थान हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आहे. हिंदू समाज हाच राष्ट्रीय समाज आहे. तो टिकला, तरच राष्ट्र टिकेल,” असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री पराग कंगले यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत आयोजित ‘संघ शिक्षा वर्गा’चा प्रकट समारोप शनिवार, दिनांक २४ मे […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

हरित ऊर्जा, उद्योग, रोजगार आणि गुंतवणुकीला चालना देणारा देवेंद्र फडणवीसांचा मास्टरप्लान; मुख्यमंत्र्यांचे निती आयोगात सादरीकरण

नवी दिल्ली: महाराष्ट्र सरकारने ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय संकल्पनेस अनुरूप स्वतःचे ‘व्हीजन 2047’ तीन टप्प्यांत तयार केले असून, त्यानुसार 100 दिवसांच्या सुशासन कार्यक्रमात 700 हून अधिक उद्दिष्टे साध्य करण्यात आली आहेत. आता दीडशे दिवसांचा विस्तृत कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 2029 पर्यंतचे अल्पकालीन, 2035 पर्यंतचे मध्यमकालीन आणि 2047 पर्यंतचे दीर्घकालीन असे तीन स्तरांचे नियोजन महाराष्ट्राच्या […]