महाराष्ट्र

एकेरी भाषेत बोलाल तर उत्तर एकेरी भाषेत दिलं जाईल : आ. प्रसाद लाड यांचा इशारा

X : @NalavadeAnant

मुंबई: मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत आरोप करत आहेत, ते यापुढे आम्ही सहन करु शकत नाही. यापुढे जर त्यांनी असं केलं तर त्यांना देखील एकेरी भाषेतच उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड (BJP MLC Prasad Lad) यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

जरांगे नवे नटसम्राट……

जरांगे – पाटील (Manoj Jarange-Patil) हे राज्यातील राजकारणातले नवे नटसम्राट झालेले आहेत. रोज उठतात आणि आपली भूमिका बदलतात. रोज नाटक करतात, आजारीपणात मला असं झालं, मला तसं झालं असे सांगतात, मुंबईच्या दिशेने निघतात, पुन्हा युटर्न घेतात आणि अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करतात. हे साफ चुकीचे असून आता समाजही याला खपवून घेणार नाही, असेही लाड यांनी यावेळी नमूद केले.

देवेंद्र फडणवीस हे एकटेच ब्राह्मण समाजाचे पूर्णवेळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. महाराष्ट्रात कायम मराठा मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि ही सल कुठेतरी मराठा समाजातील शरद पवार (Sharad Pawar) यांना टोचते आहे आणि त्यामुळे फडणवीस यांच्या विरोधामध्ये कटकारस्थान केले जात असल्याचा आरोप आ. लाड यांनी केला.

जरांगे पाटील हे शरद पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राजेश टोपे (Rajesh Tope) यांची स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत. जे मुद्दे त्यांचे असतात तेच मुद्दे जरांगे – पाटीलचे देखील असतात. त्यामुळे यामागे आमचा थेट आरोप आहे की, शरद पवार यांची ते तुतारी वाजवत आहेत, असा दावा आ. लाड यांनी केला.

Also Read: मुंबई महापालिका : कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रियेत राखीव जागांसाठी

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात