महाराष्ट्र ताज्या बातम्या

पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेल : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच स्पष्टीकरण

X: @therajkaran

मुंबई: भाजपाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar on BJP) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे. नार्वेकर त्याप्रमाणे कामाला देखील लागलेले आहेत. तरीही याबाबत नार्वेकर यांनी आपली बाजू मांडली आहे. जागावाटपाचा निर्णय हा पूर्णतः पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात येईल. मला पक्षाने याआधीच खूप काही दिल्याने मी अत्यंत समाधानी आहे. पक्षाकडून मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी पार पाडेल, असे नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे.

दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवरून सध्या महायुतीत (Mahayuti) मोठा गोंधळ आहे. या जागेवर शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena Shinde Group) दावा करण्यात आलेला आहे. परंतु, आता विधानसभा अध्यक्षांना आपल्या बाजूने उभे करून भाजप (BJP) मोठी खेळी आखत आहे. विधानसभा असो, लोकसभा असो किंवा पक्ष संघटनेचे काम दिले तरी ते मी पार पाडेल. पण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजप एनडीएचाच उमेदवार विजयी होईल, हे निश्चित असल्याचे राहुल नार्वेकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा पुढील आठवड्यात कधीही जाहीर होऊ शकतात. यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. तर इच्छुक उमेदवारांनीही आपापल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 195 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामुळे आता महाराष्ट्रातून भाजपा कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवते, यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात